श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील रेल्वे ओव्हरब्रिज अत्यंत अरुंद असल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लग्नसराई व साखर कारखाना हंगामात उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने या ओव्हरब्रिजवर अनेकदा मोठे अपघात व वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.अरुंद ओव्हरब्रिजवरून उसाने भरलेली अवजड वाहने, इतर चारचाकी व दुचाकी वाहनांची एकाच वेळी ये-जा होत असल्याने शेतकरी, वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे.या गंभीर समस्येबाबत इंदिरानगर येथील नागरिक व शेतकरी प्रतिनिधींनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या निवासस्थानी निवेदन देऊन रेल्वे ओव्हरब्रिज तातडीने रुंद करणे अथवा नवीन उड्डाणपूल मंजूर करण्याची मागणी केली आहे.
श्रीरामपूर परिसर ऊस उत्पादक भाग असल्याने भविष्यात उसाच्या वाहतुकीचे प्रमाण अधिक वाढणार असून, होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर मुरकुटे,माजी सभापती डॉ.वंदना मुरकुटे, अशोक पवार , प्रा. बाबुराव उपाध्ये , सुजित कडू , करण नवले , उदय खराडकर,भगीरथ जाधव ,भगवान शिंदे , शिवाजी दोंड , सदाशिव पटारे , बाबासाहेब कुसेकर , विठ्ठल सोनवणे ,शिवाजी शिंदे , दिलीप महाजनी , दीपक दरंगे , उल्हास पाटील , पोपटराव मैड , दत्तात्रय जायभाय , नारायण सोनवणे व रेल्वेचे अधिकारी आदी नागरिक उपस्थित होते.
