हिंदुत्ववादी दलाल अन क्रॉस व्होटींगमुळे भाजपाचा पराभव-पालकमंत्री विखे पाटील;भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

श्रीरामपूर-हिंदुत्वाच्या नावाखाली ज्यांनी श्रीरामपुरात आयुष्यभर दलाल्या केल्या त्यांच्यामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी हा पराभव...

श्रीरामपूर-
हिंदुत्वाच्या नावाखाली ज्यांनी श्रीरामपुरात आयुष्यभर दलाल्या केल्या त्यांच्यामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी हा पराभव तांत्रिक असून भारतीय जनता पक्षाने निवडणु‌कीत जे श्रीरामपूरच्या विकासाचे आश्वासनं दिले ते पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू,असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात  पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे मार्गदर्शन करताना बोलत होते.येथील उत्सव मंगल कार्यालयात नगरपालिकेत निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांचा सत्कार समारंभ विखे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की,एका देशद्रोही माणसाच्या अंत्यविधीला श्रीरामपुरात एवढे लोक येतात आणि असे सांगितले जाते की तो या बॉम्बस्फोटात नव्हता, तो त्या बॉम्ब स्फोटात होता.बॉम्बस्फोटातील आरोपीचे समर्थन करणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली दलाली करणारेही या विषयावर शब्दभर बोलायला तयार नाही. त्यांची अजून साधी प्रतिक्रिया देखील यावर नाही. या महाराजांचं नाव घ्यायचं,त्या महाराजांचं नाव घ्यायचं.महाराज लोकांना खोटेनाटे सांगून या दलालांनी आजवर दलाल्या केल्या.त्यांची वस्तुस्थिती त्या महाराजांपुढे मांडून तुम्हाला यांनी कसे फसवले हे सांगण्याची गरज आहे.आपल्यामध्ये काहींनी वर्षानुवर्षे मांडवलीचा धंदा स्विकारलेला आहे आणि या मांडवलीच्या या धंद्यामु‌ळे हा पराभव स्विकारवा लागला आहे. अनेक ठिकाणी १०-१०, २०-२० मतांनी उमेदवार पराभूत झाले त्या ठिकाणी या दलाली करणाऱ्या लोकांना ४००-५०० मतं पडली,त्यामुळे हा पराभव झाला. हा तांत्रिक पराभव आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला १८ हजार मतं पडली, काही वॉर्डामध्ये आपल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला जादा मतदान आहे तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी कमी मतं आहे. क्रॉस व्होटींगचाही फटका पक्षाला बसला आहे. ते का झालं? याची कारणमिमांसा करत बसण्यापेक्षा पराभव झाला, तो सोडून देत पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागणे गरजेचे आहे.देशात, राज्यात भाजपाचं खंबीर नेतृत्व असल्याने येणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत शतप्रतिशत भाजपाला निवडून आणायचे आहे,असे ना. विखे पा.यांनी स्पष्ट केले.शहरातील वॉर्ड नं.२ मध्ये जावून  एका विशिष्ट भागात  विरोधकांना १५ जागा मिळतात. भाजप सरकारच्या योजना तुम्हाला चालतात मात्र मतदानावेळी या पक्षाचे तुम्हाला एवढे वावडे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आपल्या नगरसेवकांचा यंत्रणेवर दबावर राहीला पाहीजे. समोरचे लोक जे निवडून आले ते एका विशिष्ट भागातूनच निवडून आले. मी कर्मवीर चौकात एकाच पोस्टर पाहीलं, मी मुख्याधिकाऱ्यांना आणि पोलिसांना विचारणार आहे की हे देशभक्ताचं पोस्टर आहे की कोणाचं आहे? एक देशद्रोही माणूस आहे, त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहे. केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम जामीनावर तो सुटलेला होता. तो बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. अशा माणसाचे पोस्टर लागतात यापेक्षा आणखी काय दुर्दैव पाहीजे. तुम्ही नागरीकांनी स्वतःहुन ते काढून टाकायला पाहीजे होते. पण आपल्यामध्ये धमक कुठे राहीली? हा याला घाबरतो, तो त्याला घाबरतो असत असंच आपण बोटचेपेपणाचं धोरण स्विकारलं तर आपल्याला लोकं रस्त्यावर फिरून देणार नाही,असेही पालकमंत्री विखे पाटील शेवटी म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. नगराध्यक्ष संजय फंड, मा.सभापती दिपक पटारे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, गिरीधर आसने, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, संजय गांगड, संजय छल्लारे, आशिष धनवटे, सौ. वैशाली चव्हाण, दिपक चव्हाण, सौ. स्नेहल खोरे,भाऊसाहेब बांदरे,शंकर मुठे,आशाताई रासकर यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!