आठ दिवसात विस्थापित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू-पालकमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच शहरातील अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून येत्या आठ दिवस दिवसांत विस्थापितांच्या पुनर्वसनाचा...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,एसटी महामंडळाचे अधिकारी तसेच शहरातील अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून येत्या आठ दिवस दिवसांत विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकालीकाढू असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत येथे शासकीय आढावा बैठकीला आले होते. त्यावेळी त्यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली  विस्थापित दुकानदारांचे पुनर्वसन करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,श्रीरामपूर शहरात एसटी महामंडळाची फार मोठी जागा उपलब्ध आहे. त्या जागेमध्ये गाळे बांधून विस्थापित व्यापाऱ्यांना ते गाळे देण्याचा आपला विचार आहे.
याप्रसंगी सुभाष त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड, बेलापूर रोड, गोंधवणी रोड, नेहरू मार्केट समोरील विविध व्यवसाय करून आपली उपजीविका भागवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर श्रीरामपूर नगरपरिषदेने बुलडोझर फिरवून त्यांना बेरोजगार केले.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. एसटी महामंडळाच्या जागेत गाळे बांधून पुनर्वसन करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.तोपर्यंत विस्थापित व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे त्या जागेवर पाच फुटांची जागा देऊन त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात यावे. विस्थापित व्यापारी त्यासाठी नगरपरिषदेबरोबर एखादा  करारनामाही करून देण्यास तयार आहेत. त्यावर पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यास सहमती दर्शवली असल्याचेही त्रिभुवन यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!