श्रीरामपूरात महायुती फिस्कटली;भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मा.खा.विखे यांचे शहरात बैठकांचे सत्र;नगरसेवकपदांसाठी ’22-12’च्या फॉर्म्युला?

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीतही बिनसल्याची चर्चा आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत युतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीतही बिनसल्याची चर्चा आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत युतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या.नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांच्या ‘मनासारखे’ घडत नसल्याने महायुतीत अखेर बिनसले आहे. शिवसेना नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सर्व 34 जागा लढवणार असून भाजप-राष्ट्रवादी नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी ’22-12′ च्या फॉर्म्युलावर एकत्र लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.मा.खा.सुजय विखे पाटील हे आज संध्याकाळी उशिरा श्रीरामपूरात दाखल झाले. त्यांची सर्व पदाधिकाऱ्यांशी उशिरापर्यंत ‘वन टू वन’ चर्चा सुरू होती.चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.


नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या करण ससाणे यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाचा उमेदवार आज अखेरपर्यंत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही.परंतु आज शिवसेनेकडून पक्षाचा एबी फॉर्म भाजपतुन शिवसेनेत आलेले प्रकाश चित्ते यांना देण्यात आल्याने तेच शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील,असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान महायुती करूनच निवडणूक लढवावी जेणेकरून विधानसभा निवडणुकीत जे काही झाले ते टाळता येऊ शकेल या विचाराने अखेरच्या क्षणापर्यंत भाजप-सेनाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती.परंतु शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार ठरेल तो भाजपने मान्य करावा अशी अट चर्चेत ठेवण्यात आल्याने भाजपने ती मान्य केली नाही.त्यामुळे युती फिस्कटली अशी चर्चा आहे.शिवसेना आता स्वतंत्र तर भाजप-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले असून नगरसेवकपदाच्या 22 जागा भाजप तर 12 जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज फायनल झाले असून नगराध्यक्षपदाबाबत मात्र ‘सस्पेन्स’ कायम आहे.दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली आहे.’कमळ की घड्याळ’ यापैकी कुठल्या चिन्हावर नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी यावर चर्चा सुरू असल्याचे माहिती आहे.परंतु त्याबाबत अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मा.खा.सुजय विखे पाटील हे आज संध्याकाळी उशिरा श्रीरामपूरात दाखल झाले. त्यांची सर्व पदाधिकाऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत वन टू वन चर्चा सुरू होती.उद्या दि.17 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून नगराध्यक्षपदासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच ते एखादा राजकीय भुकंप घडवतात का, याविषयी उत्सुकता आहे.भाजप माजी नगराध्यक्ष संजय फंड व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करते की धक्कातंत्राचा वापर करते याविषयी उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे राहून सुमारे 50 हजार मते मिळवून चर्चेत राहिलेले हिंदुत्ववादी नेते राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याही शहरात गाठीभेटी सुरू असून त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे मोबाईलवरील बदललेले स्टेटस अत्यंत ‘बोलके’ व लक्षवेधी ठरत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!