श्रीरामपूरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको-मा.खा.विखे पाटील;छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २ नोव्हेंबरला अनावरण

श्रीरामपूर-चांगले लोक पक्ष संघटनेत येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे अशी चांगली लोकं पक्षात आलिही पाहिजेत.ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना...

श्रीरामपूर-
चांगले लोक पक्ष संघटनेत येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे अशी चांगली लोकं पक्षात आलिही पाहिजेत.ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना भाजप पक्षात चांगले भविष्य आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरामपूरात राजकीय भूकंप झाला तर आश्चर्य वाटायला नको, असे राजकीय भाकीत मा.खा.सुजय विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते.भाजपमध्ये येणाऱ्या निवडणूक काळात होऊ घातलेल्या नवीन पक्षप्रवेशाविषयी विखे पाटील यांना छेडले असता त्यांनी रोखठोकपणे आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फंड, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे,तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.शहराच्या मध्यभागी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवार, २ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे मा.खा.डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासही प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे कामही जलदगतीने पूर्ण होईल. स्मारकासाठी वनविभागाच्या जागेची अडचण दूर केली गेली आहे, तसा प्रस्ताव लवकरच नगरपरिषदेकडे पाठवला जाईल असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.त्यांनतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली.
महायुती संदर्भात बोलताना मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची 90 टक्के महायुती करण्यासाठी समन्वय झालेला आहे.श्रीरामपूर तालुक्याबाबत बोलायचे झाल्यास महायुतीची चर्चा करण्यासंदर्भात नेमके बोलायचे तरी कोणाशी असा प्रश्न आम्हाला पडला आहे.शिवसेनेच्या शिंदे गटातील कोणत्या नेत्याशी बोलायचे तसेच काहीसे राष्ट्रवादीच्या बाबतही झालेले आहे.त्यामुळे आता राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांनीच आपल्याला एक समन्वयक द्यावा, ज्याच्याशी आपण महायुतीसंदर्भात चर्चा करू शकू अशी मिश्किल टिपणीही त्यांनी यावेळी केली.

श्रीरामपूर तालुक्यातील वाढलेल्या गुन्हेगारीविषयी बोलताना ते म्हणाले शिर्डीप्रमाणेच श्रीरामपूरलाही महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स एमएसएमच्या माध्यमातून गुन्हेगारीला आटकाव केला जाईल.नगरपालिका व एम एसएफ यांच्यात त्याबाबत करार केला जाणार आहे. पुढील एक वर्षात शिर्डीप्रमाणे श्रीरामपूरही गुन्हेगारीमुक्त करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.आमदार हेमंत ओगले व आपल्यात विकासकामाच्या श्रेयवादावरून धुसफूस आहे का, यावर डॉ. विखे म्हणाले ओगले हे माझे जुने सहकारी आहेत.जे काम तुमचे आहे त्याचे श्रेय तुम्ही जरूर घ्या. मात्र जे काम महायुतीच्यावतीने केले जात आहे त्याचे श्रेय पालकमंत्र्यांचेच आहे.ते जे काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे शहरासह तालुक्यात त्यांचीच प्रतिमा खराब होणार आहे.पालकमंत्र्यांनी त्यांना चार कोटी रुपयांचा विकास कामांसाठी निधी देऊ केलेला आहे.
श्रीरामपूर शहराची पुढील पाच वर्षांचे विकासकामे नगरपरिषदेमार्फत केली जाणार आहेत. आगामी २५ वर्षे शहर उभे करण्याचा मानस आहे. अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन, उपनगर विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याला प्राधान्य देणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

मा. खा. सुजय विखे पाटील
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!