श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना, भाजपच्या सक्रिय पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरला तात्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये सध्या केवळ एक दिवसपुरेल एवढा पाणीसाठा उरला असून, यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण होते. वाढत्या उष्णतेमुळे व पावसाअभावी तलावातील जलसाठा कमी होत गेला असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
ही स्थिती लक्षात घेता, भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईतील रॉयलस्टोन निवासस्थानी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन श्रीरामपूरसाठी तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली. या शिष्टमंडळात भाजपा अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बंडूकुमार शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या मागणीची गांभीर्याने दखल घेत नामदार विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याशी थेट संपर्क साधून श्रीरामपूरला तत्काळ पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले. त्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे श्रीरामपूरकर नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या शिष्टमंडळाने वेळेवर केलेली ही भेट अत्यंत परिणामकारक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, जनतेच्या मूलभूत गरजांकडे शासनाचे लक्ष वेधून तातडीने कृती घडवून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शहरामध्ये मागील काही आठवड्यांपासून होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. तलावातील जलसाठा संपत चालल्याने संभाव्य आरोग्यविषयक आणि नागरी अडचणी लक्षात घेता भाजपने हा पुढाकार घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी शासन दरबारी एकसंघ स्वरूपात पाठपुरावा करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे तात्पुरत्या स्वरूपात का होईना, श्रीरामपूर शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघाला असून, यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, ही समस्या फक्त तात्पुरत्या उपायांनी सुटणार नसून, भविष्यातील गंभीर पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज अधिक तीव्रतेने अधोरेखित झाली आहे. शासन व स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयातून आगामी काळात स्थायी स्वरूपाचा पाणीपुरवठा आराखडा तयार करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपच्या प्रयत्नांना यश; जलसंपदा मंत्र्यांकडून श्रीरामपूरला तात्काळ पाणीपुरवठ्याचे आदेश

संबंधित बातम्या
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड
श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी
अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा
श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती
गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप
श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना
‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम
श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या
बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती
श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती
श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात
Latest News
Trending News




