भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनकर यांचा राजीनामा घ्या-तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

श्रीरामपूर:अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई...

श्रीरामपूर:
अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्यासोबत महिलांबरोबर नाचत असतानाचा एक व्हिडिओ देखील देसाई यांना महिलांनी पाठवला आहे. याबाबतची माहिती स्वतः तृप्ती देसाई यांनी समाजमाध्यमात दिली आहे.देसाई यांचा तो व्हिडीओ आज मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यात देसाई यांनी म्हटले की भाजप च्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्या तक्रारीत या महिलांनी म्हटले की,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर  हे आम्हाला पक्षात पदे मिळवून देण्याच्या आमिषाने रात्री उशिरापर्यंत धाब्यावर बोलावून घेवून तिथे थांबवणे, दारू पिऊन नाचायला लावणे व पार्ट्या करणे अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करायला लावत आहेत.तसेच दिनकर यांना असलेल्या पोलीस संरक्षणाचा वापर ते दहशत निर्माण करण्यासाठी करतात.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते जवळचे असल्याने त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याचे धाडस करत नाही.असे धाडस कुणी केलेच तर त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे काम ते करतात,असे या पदाधिकारी महिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षच जर महिलांना अशी वागणूक देणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेणे गरजेचे आहे.आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करणे सुद्धा गरजेचे आहे,असे या तक्रारीच्या अनुषंगाने तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सभापती राम शिंदे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी अशीही विनंती त्यांना केल्याचे तृप्ती देसाई यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराने अहिल्यानगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!