भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनकर यांचा राजीनामा घ्या-तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

श्रीरामपूर:अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई...

श्रीरामपूर:
अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्यासोबत महिलांबरोबर नाचत असतानाचा एक व्हिडिओ देखील देसाई यांना महिलांनी पाठवला आहे. याबाबतची माहिती स्वतः तृप्ती देसाई यांनी समाजमाध्यमात दिली आहे.देसाई यांचा तो व्हिडीओ आज मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यात देसाई यांनी म्हटले की भाजप च्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्या तक्रारीत या महिलांनी म्हटले की,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर  हे आम्हाला पक्षात पदे मिळवून देण्याच्या आमिषाने रात्री उशिरापर्यंत धाब्यावर बोलावून घेवून तिथे थांबवणे, दारू पिऊन नाचायला लावणे व पार्ट्या करणे अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करायला लावत आहेत.तसेच दिनकर यांना असलेल्या पोलीस संरक्षणाचा वापर ते दहशत निर्माण करण्यासाठी करतात.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते जवळचे असल्याने त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याचे धाडस करत नाही.असे धाडस कुणी केलेच तर त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे काम ते करतात,असे या पदाधिकारी महिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षच जर महिलांना अशी वागणूक देणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेणे गरजेचे आहे.आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करणे सुद्धा गरजेचे आहे,असे या तक्रारीच्या अनुषंगाने तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सभापती राम शिंदे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी अशीही विनंती त्यांना केल्याचे तृप्ती देसाई यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराने अहिल्यानगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!