भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनकर यांचा राजीनामा घ्या-तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

श्रीरामपूर:अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई...

श्रीरामपूर:
अहिल्यानगर भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षतील काही पदाधिकारी महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्यासोबत महिलांबरोबर नाचत असतानाचा एक व्हिडिओ देखील देसाई यांना महिलांनी पाठवला आहे. याबाबतची माहिती स्वतः तृप्ती देसाई यांनी समाजमाध्यमात दिली आहे.देसाई यांचा तो व्हिडीओ आज मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. त्यात देसाई यांनी म्हटले की भाजप च्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.त्या तक्रारीत या महिलांनी म्हटले की,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर  हे आम्हाला पक्षात पदे मिळवून देण्याच्या आमिषाने रात्री उशिरापर्यंत धाब्यावर बोलावून घेवून तिथे थांबवणे, दारू पिऊन नाचायला लावणे व पार्ट्या करणे अशा प्रकारचे घाणेरडे प्रकार करायला लावत आहेत.तसेच दिनकर यांना असलेल्या पोलीस संरक्षणाचा वापर ते दहशत निर्माण करण्यासाठी करतात.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते जवळचे असल्याने त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याचे धाडस करत नाही.असे धाडस कुणी केलेच तर त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे काम ते करतात,असे या पदाधिकारी महिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षच जर महिलांना अशी वागणूक देणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेणे गरजेचे आहे.आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करणे सुद्धा गरजेचे आहे,असे या तक्रारीच्या अनुषंगाने तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सभापती राम शिंदे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांची त्वरित पक्षातून हकालपट्टी करावी अशीही विनंती त्यांना केल्याचे तृप्ती देसाई यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराने अहिल्यानगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

तृप्ती देसाई महिला पदाधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीचा दिला दाखला

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!