खोड्या करणाऱ्यांकडे पिढ्यानपिढ्याची सत्ता-मा.आ.मुरकुटे;टाकळीभान येथे अशोक बंधाऱ्याचे जलपूजन

श्रीरामपूर-खोड्या करणाऱ्यांकडे पिढ्यानपिढ्याची सत्ता आहे.ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे ते मंत्री असल्याने त्यांना कुठल्याही अडचणी येत नाहीत,अशी टीका माजी आ.भानुदास...

श्रीरामपूर-
खोड्या करणाऱ्यांकडे पिढ्यानपिढ्याची सत्ता आहे.ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे ते मंत्री असल्याने त्यांना कुठल्याही अडचणी येत नाहीत,अशी टीका माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता केली.परंतु त्यांचा रोख कुणाकडे आहे हे उपस्थितांच्या लक्षात आल्याने एकच खसखस पिकली.तसेच भविष्यात मतदारसंघ खुला होईल.त्यावेळी आम्ही चुकीचे वाटत असलो, तर दुसऱ्या व्यक्तीला निवडून द्या, पण तो आपल्या तालुक्यातीलच निवडून द्या, बाहेरच्याला निवडून देऊ नका,अन्यथा आपल्याला गुलामगिरीत दिवस घालवावे लागतील,असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.यापूर्वी तत्कालीन मंत्री स्व. गोविंदराव आदीक यांच्या माध्यमातूनही अनेक भरीव कामे आपल्या तालुक्यात राबविली गेल्याची आठवण मुरकुटे यांनी यानिमित्ताने काढली.
टाकळीभान येथे अशोक बंधाऱ्याचे जलपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी मुरकुटे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानदेव साळुंके होते. माजी संचालक एकनाथ लेलकर,  शिवाजी शिंदे, संचालक नीरज मुरकुटे, बाजार समिती संचालक मयूर पटारे, दत्तात्रय नाईक, पुंजाहरी शिंदे, गणेश छल्लारे आदी प्रमुख उपस्थित होते.
मुरकुटे पुढे म्हणाले की,राखीवमुळे जो आमदार निवडून येतो तो प्रभावशाली नसतो.आपल्या हातात कारखाना सोडला तर दुसरी सत्ता नाही. राहुरीचा कारखाना बंद पाडला तसा अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव सध्या सत्तेत असणाऱ्यांचा आहे. ही कामधेनू जपण्यासाठी आम्ही जुन्या पिढीतील लोकांनी संघर्ष केला आहे. हीच आपली कामधेनू टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी ‘अशोक’ च्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ‘अशोकला’च उस द्यावा.श्री. मुरकुटे पुढे म्हणाले जलपूजनाचा कार्यक्रम हे फक्त निमित आहे. मात्र, अशोक कारखान्याबद्दल चुकीची माहिती सभासद शेतकऱ्यांमध्ये पोहचवली जात आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळावी, यानुसार आजची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर अशोक ज्यावेळी आमच्या ताब्यात आला, त्यावेळी या कार्यक्षेत्रात फक्त पस्तीस हजार टन उस होता. अशा परिस्थितीत कारखाना कसा चालवायचा, असा प्रश्न समोर आला होता. काही जणांनी कारखाना बंद करण्याचा सल्लाही त्यावेळी दिला. मात्र, आपण यावर मात करत बाहेरून उस आणून हा कारखाना चालविला. त्याचबरोबर मी १९८० साली आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून गोदावरी,प्रवरा नदीबर कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांची मालिका उभारून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम युद्धपातळीवर राबविली. आपण आपल्या भागात ओढे-नाले तसेच जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे बंधारे व तळे बांधले. व त्याचाच परिपाक म्हणून या दोन्ही नद्यांचे कार्यक्षेत्र ऊसाचे आगार म्हणून ओळखले जाऊ लागले. अशोक पेक्षा दुसरे कारखाने भाव जास्त देत आहेत. म्हणून बाहेर ऊस दिला गेला. परंतु आपल्या शेजारील मुळा, ज्ञानेश्वर यांचे गाळप आपल्यापेक्षा जास्त असूनही त्यांचा भाव आपल्या बरोबरीने म्हणजेच २७०० रुपये आहे. काही कारखान्यांना दारू निर्मितीची जोड असल्याने ते जास्त भाव देतात. आपल्या कारखान्याचे गाळप साडेचार लाख टन झाले आहे. गाळप कमी झाल्यास हा कारखाना चालणार नाही.यावेळी माजी उपसरपंच पाराजी पटारे, भाऊसाहेब पटारे, संजय पटारे, लक्ष्मण सटाले, भागवत रणनवरे, संजय रणनवरे, शिवाजी पटारे, दत्तात्रय पटारे, रावसाहेब वाघुले, मच्छिंद्र कोकणे, भास्कर कोकणे, दत्तात्रय बोडखे, सुनिल बोडखे, सुनिल त्रिभूवन, जालींदर वेताळ, अमोल पटारे, नानासाहेब लेलकर, अमोल कोकणे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय कोकणे, उत्तम पवार, शिवाजी नवले आदी सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

टाकळीभान येथील जलपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. आ. भानुदास मुरकुटे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!