अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मदत संजीवनी ठरेल-भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बांद्रे

श्रीरामपूर-राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटींच्या मदतिचे पॅकेज जाहीर केले.वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे.आजपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीसाठी...

श्रीरामपूर-
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटींच्या मदतिचे पॅकेज जाहीर केले.वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे.आजपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीसाठी एवढी मोठी भरीव मदत यापूर्वी कधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजाला उभारी मिळाली आहे. ही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरेल, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बांद्रे यांनी केले आहे.
बांद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,
केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे बळीराजाच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक राहिलेले आहे.राज्यात दि.13 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. खरीप हंगामातील सोयाबीन,कपाशी,मका तूर, उडीद व इतर कापणीसाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी हवालदील झाला. कुणाची पिके वाहीली तर कुणाची जनावरे मृत्युमुखी पडली. कुणाची घरी पडली तर कुणाची शेतीत खरडून वाहून गेली. काहींच्या विहिरींची पडझड झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लोणी येथील दौऱ्यात खुद्द शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  व उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे महायुती सरकारने भरीव मदत जाहीर केली.तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला पद्मश्री डॉ.विखे साखर कारखान्याच्यावतीनेही एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्याबद्दलही भाजप किसान मोर्चाच्या वतीने बांद्रे यांनी आभार मानले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!