अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मदत संजीवनी ठरेल-भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बांद्रे

श्रीरामपूर-राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटींच्या मदतिचे पॅकेज जाहीर केले.वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे.आजपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीसाठी...

श्रीरामपूर-
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटींच्या मदतिचे पॅकेज जाहीर केले.वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर झाली आहे.आजपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीसाठी एवढी मोठी भरीव मदत यापूर्वी कधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या बळीराजाला उभारी मिळाली आहे. ही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरेल, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बांद्रे यांनी केले आहे.
बांद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,
केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे बळीराजाच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक राहिलेले आहे.राज्यात दि.13 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. खरीप हंगामातील सोयाबीन,कपाशी,मका तूर, उडीद व इतर कापणीसाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी हवालदील झाला. कुणाची पिके वाहीली तर कुणाची जनावरे मृत्युमुखी पडली. कुणाची घरी पडली तर कुणाची शेतीत खरडून वाहून गेली. काहींच्या विहिरींची पडझड झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लोणी येथील दौऱ्यात खुद्द शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  व उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे महायुती सरकारने भरीव मदत जाहीर केली.तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला पद्मश्री डॉ.विखे साखर कारखान्याच्यावतीनेही एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्याबद्दलही भाजप किसान मोर्चाच्या वतीने बांद्रे यांनी आभार मानले आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!