अपघाताचा बनाव करून विमा कंपनीची फसवणूक; टाकळीभानच्या दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर –
अपघात झाल्याचा बनाव करून जनरल इन्शुरन्स (विमा) कंपनीची आर्थिक लाभासाठी दिशाभूल करून फसवणूक केल्या प्रकरणी टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील दोन जणांवर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वतःमोटारसायकलवरून पडलेला असताना दुसऱ्या मोटारसायकलची धडक बसून आपण जखमी झाल्याची खोटी माहिती देवून विमा कंपनीची फसवणूक केली म्हणून टाकळीभान येथील किरण अर्जुन वाकचौरे आणि अविनाश जगन्नाथ लोखंडे यांच्याविरोधात सदर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुझम्मिल शेख, व्यवसाय-आयसीआयसी लोमबार्ड सल्लागार, यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण सदर कंपनीत 2 वर्षापासून सल्लागार म्हणून काम करीत आहे. श्रीरामपूर न्यायालयात अपघातातील जखमी किरण अर्जुन वाकचौरे यांची इन्शुरन्स क्लेमची केस आहे.यात
मोटारसायकलचा अपघात होवून वाकचौरे हे जखमी झाल्याने 7 लाखांचा दावा त्यांनी दाखल केला होता. म्हणून सदर अपघाताची सत्यपडताळणी केली असता किरण वाकचौरे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सायं.६ वा. टाकळीभान येथून कांदा लिलाव पाहून मी घरी पायी जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलने मला धडक मारल्याने त्यात माझ्या उजव्या पायाला मार लागला. आपल्यावर शिरसाठ हॉस्पीटल येथे उपचार करण्यात आले. शिरसाठ हॉस्पीटल येथील जखमीच्या उपचारांच्या कागदपत्रांमध्ये व किरण वाकचौरे याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये ‘फॉल फ्रॉम मोटारसायकल’ असे दिसून आले. त्याचा अर्थ जखमी हे स्वतः मोटारसायकल चालवत असताना पडले. गाडीचालक स्वतः पडून जखमी झाल्यास इन्शुरन्स क्लेमसाठी पात्र ठरत नाही. असे असताना देखील फिर्याद देताना जखमी यांनी पायी चालत असल्याचे सांगितले व दुसऱ्या मोटारसायकलने आपल्याला धडक दिल्याचे नमूद केले. सदर मोटारसायकलच्या तांत्रिक तपासणीमध्ये मोटारसायकलची उजव्या बाजूची नंबरप्लेट वाकलेली होती. तसेच उजव्या बाजूचे भंपर घासलेले होते. तसेच जखमीच्याही उजव्या पायाला जखमी झालेली असल्याने जखमी वाकचौरे हे मोटारसायकलवरून पडून जखमी झाल्याचे स्पष्ट ‌होते. अशा प्रकारे सदर वस्तुस्थिती लपवून आपल्याला दुसऱ्या मोटारसायकलने धडक मारल्याची खोटी माहिती देवून विमा कंपनीकडून आर्थिक लाभासाठी दिशाभूल करत कंपनीची फसवणूक केल्याचे शेख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून किरण अर्जुन वाकचौरे,अविनाश जगन्नाथ लोखंडे यांच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

संबंधित बातम्या

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

Latest News

Trending News