सोयाबीन चोरी करणारी आणखी एक टोळी जेरबंद;अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाची कारवाई

श्रीरामपूर-नायगाव येथील शेतकऱ्याचे सोयाबीन चोरल्या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने धडक कारवाई करीत सापळा रचून पाच जणांना अटक...

श्रीरामपूर-
नायगाव येथील शेतकऱ्याचे सोयाबीन चोरल्या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने धडक कारवाई करीत सापळा रचून पाच जणांना अटक केली आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन चोरणारी आणखी एक टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.विशेष म्हणजे सोयाबीन चोरणारे हे सर्व चोरटे शेतकऱ्याच्या घराशेजारी राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, फिर्यादी गोरक्षनाथ भिमराज ढवळे, रा. नायगाव, ता. श्रीरामपुर यांनी त्यांचे शेतातील पत्र्याचे शेड मध्ये ठेवलेले एकुण १५ गोण्या अंदाजे ११ क्विटल सोयाबीन एकुण ४५,०००/- रु.किं.चे हे दि.०६/११/२०२५ रोजी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या म्हणुन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे  गु.र.नं. ४८७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सदरचा गुन्हा हा आरोपी सचिन जगन्नाथ मोरे, रा. नायगाव, ता. श्रीरामपुर याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यास पकडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अमंलदार यांनी सापळा रचुन आरोपी सचिन जगन्नाथ मोरे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यास त्याचे साथीदाराचे नाव विचारले असता त्याने त्यांची नावे हरीदास अर्जुन निकम, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर, शुभम जालींदर मोरे, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर,तुषार अनिल सदाफुले, वय २३ वर्ष, रा.नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर,विशाल अशोक गायकवाड, वय २१ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर अशी असल्याचे सांगीतले.

त्यावरुन लागलीच उर्वरीत आरोपी यांना पकडण्यासाठी तपास पथकाने सापळा रचुन वरील नमुद आरोपींना ताब्यात घेतले.सर्व आरोपी यांनी एकत्र येवुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यापैकी काही आरोपी हे फिर्यादी शेतकऱ्याच्या घराशेजारी राहणारे असुन त्यांनी प्रथमतः साठविलेल्या सोयाबीनची पाहणी केली. नंतर रात्री उशीरा आरोपी तुषार अनिल सदाफुले याचे पिकअप वाहन घेवुन येवुन शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरुन नेल्या. सदर गुन्हयातील चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाराचा तपास पथक कसोशीने शोध घेत असुन पुढील तपास पोहेकॉ परेश आगलावे हे पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, व मोबाईल सेलचे पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ सचिन धनाड, पो.ना.रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे, पो.हे.कॉ. परेश आगलावे यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!