श्रीरामपूर-
श्रीरामपुरात जमिनीच्या वादातून बोगस दस्त नोंदवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. येथील शेतकरी दीपक लक्ष्मण डावखर (वय ५३) यांनी आपल्या आई, बहिणी, मेहुणे तसेच शहरातील माजी उपनगराध्यक्ष व काही उद्योजकांविरुद्ध फसवणूक व धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दीपक लक्ष्मण डावखर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील जुना गट नं. ८१/१, व नवीन गट क्र. १००/९ मधील क्षेत्रफळ ३.७१ हेक्टर शेतजमीन वडील लक्ष्मण परशुराम डावखर यांच्या सन २०११ मधील मृत्यूपत्राद्वारे त्यांच्या नावावर झाली होती.या जमिनीचा 7-12 उतारा व मालकी नोंद आजही त्यांच्या नावावर आहे. तरीसुद्धा कुटुंबातील काही सदस्यांनी आणि बाहेरील उद्योजकांनी संगनमत करून कोर्टाच्या स्थगिती आदेशाची पायमल्ली करत खोटा आपसमजूतीचा करार नोंदवला.
सदर प्रकरणात डावखर यांच्या फिर्यादीवरून वैशाली शिवराम साठे, अर्चना भास्कर दिघे, जनाबाई ऊर्फ
बबई लक्ष्मण डावखर, सुशिलाबाई लक्ष्मण डावखर, अनिल माणिक इंगळे, विलास अशोक ससे, शेख अंजुम
परवेज मुसा अहमद या सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता संहिता ३६४ ए,४२०, ४०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये माजी नगरसेवक अंजुम शेख यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असता त्यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर न्यायालयाने मंजूर केला आहे.
