गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...

श्रीरामपूर-
शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणं हेच खरे माणुसकीचं काम असल्याचे प्रतिपादन  माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी  केले.सावळीविहीर बु अतिक्रमिक ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून विनामूल्य प्लॉटचा हस्तांतरण माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्लॉटच्या उतार्याचे  वितरण देखील करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी माणिकराव आहेर तहसीलदार अमोल मोरे  सरपंच उमेश जपे आप्पासाहेब जपे बाळासाहेब जपे विकास जपे शांताराम जपे रावसाहेब देशमुख राजू जपे रूपाली आगलावे तसेच शासकीय अधिकारी व लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. विखे पाटील म्हणाले, “हा कार्यक्रम एक दिवसात झाला नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, विरोधकांच्या टीका सहन करत, आपण केवळ आश्वासन न देता कृती केली. जात, धर्म, पक्ष न पाहता फक्त गरज पाहून हे वाटप केले गेले. ही आमच्या कार्यपद्धतीची ओळख आहे.सोमया फॅक्टरी येथील जमीन  400 कुटुंबांना घरकुलसाठी जागा मिळावी यासाठी सोमया शेठ यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच ते प्रश्न मार्गी लावून संबंधितांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.या प्लॉट हस्तांतरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. यामध्ये कोणत्याही पुढाऱ्याच्या नातेवाईकांचा किंवा दलालांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही, हे सांगताना ते म्हणाले, या जमिनीवर एकाही पुढाऱ्याचा नातेवाईक नाही, कारण आमचं धोरण स्पष्ट आहे गोरगरीब जनतेला न्याय भेटला पाहिजे.डॉ. विखे पाटील यांनी पुढील टप्प्यांबाबतही घोषणा केली. या नव्या वसाहतीत अंगणवाडी, समाजमंदिर आणि मोफत लग्न सभागृह उभारण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत वाळू ग्रामपंचायतीमार्फत दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.डॉक्टर विखे म्हणाले शिर्डीमध्ये कायदा-सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती सहन केली जाणार नाही. गावातील प्रत्येक महिला-मुलगी रात्रीही सुरक्षिततेची पूर्ण खात्री घेऊन वावरू शकेल, असा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे.आज गरीबांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमचं खरे यश आहे. हे राजकारणासाठी नाही, तर माणुसकीसाठी केलं आहे, असे भावनिक उद्गारही त्यांनी शेवटी काढले.

सावळीविहीर बु अतिक्रमिक ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून विनामूल्य प्लॉटचा हस्तांतरण माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!