अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान...

श्रीरामपूर-
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आसल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र देवगाव शनी व सप्तक्रोषी येथील योगीराज गंगागिरी महाराज १७८वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी चे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफताना रामगिरी महाराज पुढे म्हणाले की,  भगवंत भक्ताची जात बघत नाही जो भंगवताची भक्ती करतो त्याला तो प्राप्त होतो.सप्ताहातील भजनाने भव्ताच्या मनाची शुध्दी होते एखादी वस्तू अतिदुर असली तर दिसत नाही डोळ्यातील अंजन स्वतःला दिसत नाही त्याप्रमाणे नास्तिकाला देव दिसत नाही पण गंगागिरी महाराज भजनात भजनाने  मनुष्याच्या जीवनात समाधान मिळते आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले आज समाजाची अवस्था पाहिली तर साठ टक्के समाज बिघडलेला आहे, व्यसनाधिन झाला आहे, कुठलही व्यसन विचारा अनेक व्यसनं आहेत.

महंत रामगिरी महाराज

ज्याला वाईट व्यसनं म्हणतो ते आहेच त्याबरोबरच संपत्ती,सत्ता,संतती हे देखिल व्यसनातील प्रकार आहेत. याच्या पाठीमागेच समाज लागलेला आहे व बिघडलेला आहे. आणि म्हणून या समाजाला खर्‍या अर्थानं शांती मिळत नाही. चाळीस टक्के समाज थोडा आहे तो कुठं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळावं म्हणून तो विचार करतो पण तोही दिशाहिन आहे, त्याला योग्य दिशा मिळेना झालीय. दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकतो. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो. योगीराज गंगागिरी महाराज यांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून सन्मार्गावर आणले. महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात वेळ प्रसंगी माधुकरी मागवत कन्या घुगऱ्या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले असेही महाराज म्हणाले.याप्रसंगी प्रमुख उपस्थित डॉ दिनेशभाऊ परदेशी,पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरजी शिंदे,अनुराधाताई आदिक,कुष्णा पा डोणगावकर,डॉ राजीव डोंगरे,नवनाथ महाराज मस्के,बाळासाहेब महाराज रंजाळे,ऊत्तम महाराज गाढे,अमोल महाराज गाढे रामभाऊ महाराज,व्रिकम महाराज,राजेश्र्वरगिरीजी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्यसह 4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती होती.

योगीराज गंगागिरी महाराज १७८वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफताना रामगिरी महाराज.

शेकडो भाविक करतात सप्ताहात रक्तदान
लोकमान्य बल्ड बँक, आदर्श ब्लड बँक, नित्य सेवा ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक अशा 4 रक्तपेढी वतीने दररोजचे 250 ते 300 भाविकांचे रक्त संकलन केले जाते त्याचबरोबर सप्ताह परिसरातील सर्व डॉक्टरस फामस्टीक 7 डॉक्टर मित्र परिवाराच्या वतीने 800 ते 1000 रुग्ण भाविकाचा विनामूल्य  उपचार केला जातो

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!