अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान...

श्रीरामपूर-
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आसल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र देवगाव शनी व सप्तक्रोषी येथील योगीराज गंगागिरी महाराज १७८वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी चे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफताना रामगिरी महाराज पुढे म्हणाले की,  भगवंत भक्ताची जात बघत नाही जो भंगवताची भक्ती करतो त्याला तो प्राप्त होतो.सप्ताहातील भजनाने भव्ताच्या मनाची शुध्दी होते एखादी वस्तू अतिदुर असली तर दिसत नाही डोळ्यातील अंजन स्वतःला दिसत नाही त्याप्रमाणे नास्तिकाला देव दिसत नाही पण गंगागिरी महाराज भजनात भजनाने  मनुष्याच्या जीवनात समाधान मिळते आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले आज समाजाची अवस्था पाहिली तर साठ टक्के समाज बिघडलेला आहे, व्यसनाधिन झाला आहे, कुठलही व्यसन विचारा अनेक व्यसनं आहेत.

महंत रामगिरी महाराज

ज्याला वाईट व्यसनं म्हणतो ते आहेच त्याबरोबरच संपत्ती,सत्ता,संतती हे देखिल व्यसनातील प्रकार आहेत. याच्या पाठीमागेच समाज लागलेला आहे व बिघडलेला आहे. आणि म्हणून या समाजाला खर्‍या अर्थानं शांती मिळत नाही. चाळीस टक्के समाज थोडा आहे तो कुठं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळावं म्हणून तो विचार करतो पण तोही दिशाहिन आहे, त्याला योग्य दिशा मिळेना झालीय. दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकतो. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो. योगीराज गंगागिरी महाराज यांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून सन्मार्गावर आणले. महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात वेळ प्रसंगी माधुकरी मागवत कन्या घुगऱ्या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले असेही महाराज म्हणाले.याप्रसंगी प्रमुख उपस्थित डॉ दिनेशभाऊ परदेशी,पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरजी शिंदे,अनुराधाताई आदिक,कुष्णा पा डोणगावकर,डॉ राजीव डोंगरे,नवनाथ महाराज मस्के,बाळासाहेब महाराज रंजाळे,ऊत्तम महाराज गाढे,अमोल महाराज गाढे रामभाऊ महाराज,व्रिकम महाराज,राजेश्र्वरगिरीजी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्यसह 4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती होती.

योगीराज गंगागिरी महाराज १७८वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफताना रामगिरी महाराज.

शेकडो भाविक करतात सप्ताहात रक्तदान
लोकमान्य बल्ड बँक, आदर्श ब्लड बँक, नित्य सेवा ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक अशा 4 रक्तपेढी वतीने दररोजचे 250 ते 300 भाविकांचे रक्त संकलन केले जाते त्याचबरोबर सप्ताह परिसरातील सर्व डॉक्टरस फामस्टीक 7 डॉक्टर मित्र परिवाराच्या वतीने 800 ते 1000 रुग्ण भाविकाचा विनामूल्य  उपचार केला जातो

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!