शिर्डी विमानतळाचे विस्तारिकरण अत्यंत महत्त्वाचा टप्पा-ना. विखे पाटील;विमानतळाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक

श्रीरामपूर-शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांनाभाविकांना होणार आहे, तसाच तो...

श्रीरामपूर-
शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांनाभाविकांना होणार आहे, तसाच तो व्यापारी आणि कृषी क्षेत्रालाही होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती देताना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती.

शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,
ना.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

ना. विखे पाटील पुढे म्हणाले की,शिर्डी विमानतळावर अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर काही कामे प्रस्तावित आहेत. या सर्व बाबींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित विभागांना व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश देण्यात आले.शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून शिर्डीची हवाई कनेक्टिविटी आणखी मजबूत होणार आहे. याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या भाविकांना होणार आहे, तसाच तो व्यापारी आणि कृषी क्षेत्रालाही होणार आहे. म्हणूनच आपण विमानतळाच्या विस्तारासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, असेही ना. विखे पाटील यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!