व्यक्तिद्वेष करणाऱ्यांना काय उत्तर देणार?;जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी घेतला हाकेंचा समाचार

श्रीरामपूर-त्यांना काय टिका करायची ते करु द्या,अस वक्‍तव्‍य करणारे नेतृत्‍व आपल्‍याला पाहीजे का? याचा ओबीसी समाजबांधवांनी विचार केला पाहीजे. तुम्‍ही व्‍यक्तिव्‍देशच करणार असाल...

श्रीरामपूर-
त्यांना काय टिका करायची ते करु द्या,अस वक्‍तव्‍य करणारे नेतृत्‍व आपल्‍याला पाहीजे का? याचा ओबीसी समाजबांधवांनी विचार केला पाहीजे. तुम्‍ही व्‍यक्तिव्‍देशच करणार असाल तर, माझ्याकडे याचे उत्‍तर नाही, अशा शब्‍दात जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लक्ष्‍मण हाके यांचे नाव न घेता त्‍यांचा समाचार घेतला.
ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,कोणतही आंदोलन करताना मागण्‍यांची भूमिका मांडणे गरजेची असते.ओबीसी आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही आमची भूमिका आधीपासून स्‍पष्‍ट होती. मात्र काही नेत्‍यांकडून केवळ बागुलबूवा करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. गॅझेट मधील नोंदी १९६७ सालापासून आहेत. दाखला मिळण्‍यासाठी शासनाने कार्यपध्‍दती निश्चित केली आहे. मात्र काही व्‍यक्‍तिंनी प्रसिध्‍दीसाठी वक्‍तव्‍य करताना भान ठेवले नाही. सामाजिक सलोखा बिघडविण्‍याचाच त्‍यांचा प्रयत्‍न दिसत असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.
आरक्षणाच्‍या बाबतीत याचिका न्‍यायप्रविष्‍ठ असताना न्‍यायालया बाहेर काही लोकं मुक्‍ताफळ उधळीत असतील तर त्‍याला आपण काय उत्‍तर देणार, अशा टिका झाल्‍यावर वेदना होतातच, आमचे देखील अनेकांशी तात्‍वीक मतभेद आहेत, मात्र अशा भाषा आम्‍ही कधी वापरल्‍या नाहीत. मराठवाड्यात उबाठा गटाच्या उध्‍दव ठाकरे यांनी काढलेल्‍या मोर्चावर टिका करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, त्‍यांच्‍याकडे आता हंबरडा फोडण्‍याशिवाय काहीच राहीलेले नाही. शासनाने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतक-यांना नियम बदलून मर्यादा वाढवून दिली आहे. आता फक्‍त निवडणूका जवळ आल्‍यामुळेच त्‍यांचे हंबरडा फोडण्‍याचे काम सुरु झाले आहे. सरकारला काम करु द्याव असं आवाहन ना.विखे पाटील यांनी केले.अहिल्‍यानगर जिल्‍ह्याच्‍या नामकरणा वरुन कोणी काही वक्‍तव्‍य  करीत असेल तर ते आम्‍हाला मान्‍य नाही. येथे येवून कोणी जातीय सलोखा बिघडविणार असेल तर आम्‍ही निश्चित कारवाई करु. जिल्‍ह्याचे नाव का बदलले हे विचारण्‍याचा आधिकार आता त्‍यांना नाही अशी स्‍पष्‍ट  भूमिका ना.विखे पाटील यांनी मांडली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!