श्रीरामपूर-
दुष्काळ आणि पीक नुकसानामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्ज खाते व्याज न भरल्यामुळे होल्ड किंवा लिंक ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे शासनाकडून येणारी दुष्काळ सहाय्यता आणि पीकविमा रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे, तर बँकांमध्ये व्याज वेळेवर न भरल्यामुळे त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळते.या कठीण परिस्थितीत श्री हरिहर फाउंडेशन, बेलापूर ने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यांवरील होल्ड/लीन त्वरित मुक्त करावेत, जेणेकरून शासनाकडून येणारी मदत रक्कम शेतकऱ्यांपर्यंत अडथळ्याशिवाय पोहोचू शकेल आणि आर्थिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात हरिहर फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आली.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम नाईक व सहकारी भगवानराव सोनवणे, विजयराव कुर्हे, विजयराव शेलार, मधुकर ठोंबरे, सुरेश जाधव, अमन सय्यद, ओम कुमावत, रवींद्र अमोलिक, इमाम पठाण, सचिन पवार उपस्थित होते. फाउंडेशनच्या या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली.
