सरसकट पंचनामे करण्याचे कृषी विभागाला आदेश-पालकमंत्री विखे पाटील यांची माहिती;प्रशासनाने ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या सूचना

श्रीरामपूर-पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहून उपाययोजना कराव्यात. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.मदतीच्या...

श्रीरामपूर-
पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहून उपाययोजना कराव्यात. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.मदतीच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला असलेल्या स्थायी आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. झालेल्या नुकसानीची अद्याप स्पष्ट आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
रविवारी रात्रीपासून जिल्ह्यातील सहा तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 227 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी, केडगाव, भिंगार, चिंचोडी, चास, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, कोळेगाव, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा, नान्नज, नायगाव, साकत, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव चापडगाव, मुंगी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, तिसगाव, खरवंडी, अकोला अशा 24 महसूल मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील सर्व नद्या, ओढे, नाले यांना पाणी येऊन पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती जाणून घेतली आहे. प्रशासनाने अडकलेल्या नागरीकांच्या स्थलांतरास प्राधान्य दिले आहे. पावसाची अधिकची शक्यता लक्षात घेऊन पुणे येथून एनडीआरएफ पथक बोलावून बचाव कार्य सुरू करण्यात आले असल्याचे पालकमंत्री विखे यांनी सांगितले. जामखेड-पाथर्डी सोलापूर मार्गावरील कुशल ट्रव्हल कंपनीच्या बसमधील 70 प्रवाशांची सुटका अहिल्यानगर महापालिका आणि जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने केली. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव शिवारातील पुरात अडकलेल्या 3 आणि पिंपळेगव्हाणमधील एका व्यक्तीला तसेच खरमाटवाडीमधील 25 कोरडगावमधील 45, कोळसांगवीमधील 12 व्यक्तिंची सुटका करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील खैरी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटंबातील 4 आणि वंजारवाडी येथे खैरी नदीच्या पाण्याचा वेढा पडल्याने 30 व्यक्तीची सुटका महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने करण्यात आली. शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील 12 आखेगाव येथील 25 लोकांची सुटका करण्यात प्रशासन आणि स्थानिक नागरीकांना यश आले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिराकडे जाणार्‍या भाविकांनी काळजी घ्यावी
श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिराकडे जाणार्‍या भाविकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले असून प्रशासनाला याभागात काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!