श्रीरामपुर येथे घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न | युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम

श्रीरामपुर: घरकामगार हे समाजातील एका मोठ्या उत्पादक वर्गाला सेवा पुरवतात. या प्रक्रियेत त्यांना जगण्यासाठी उत्पन्न मिळते. असंघटित क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा वर्ग...

श्रीरामपुर येथे घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न

श्रीरामपुर:

घरकामगार हे समाजातील एका मोठ्या उत्पादक वर्गाला सेवा पुरवतात. या प्रक्रियेत त्यांना जगण्यासाठी उत्पन्न मिळते. असंघटित क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा वर्ग असलेल्या घरकामगार महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या प्रचंड समस्या, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, कामाची अनिश्चितता आणि अत्यल्प वेतन अशा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या घरकामगार स्त्रिया आजही सामाजिक सुरक्षा पासून वंचित आहेत. त्यासाठी प्राध्यापक संभाजी पवार यांंच्या युवाग्राम विकास संस्था गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मजबुतीने कार्यरत आहे.त्यांचा कामाला आमचे सहकार्य व पाठबळ राहील असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेच्या बालभवन प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख यांनी केले.

श्रीरामपूर युवाग्राम विकास संस्था व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ३० जून रोजी श्रीरामपूर येथे ‘घरेलू महिला कामगार संघटना कार्यशाळा’ घेण्यात आली.यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर होते. याप्रसंगी युवाग्राम संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार,संचालक फिरोज शेख,अमोल सोनवणे, शायिस्ता शेख,अनिता शेलार,आदित्य पवार आदि मान्यवर ऊपस्थित होते.

युवाग्रामचे अध्यक्ष संभाजी पवार म्हणाले की,कोणतेही काम श्रेष्ठ दर्जाचे किंवा हलक्या प्रतीचे नसून, सर्व समान व एकमेकास पूरक आहे.हे जरी खरे असले तरी घरकाम करणाऱ्या घरेलू कामगार महिलांना समाजात फारच उपेक्षेने वागवले जाते. घरेलू कामगार महिला असंघटित क्षेत्रात काम करणा-या घरेलू कामगार महिलामध्ये एकजूट नसल्यामुळे ते आपल्या हक्काविषयी आणि अधिकाराविषयी जागृत नाही.त्यामुळे “ज्यांचे प्रश्न… त्यांचे नेतृत्व आणि त्यांचाच आवाज” या मुद्द्याला घेऊन संघटनात्मक बांधणी केली तर प्रश्न सुटण्यास मदत होईल,असे संभाजी पवार यांनी स्पष्ट केले.

जेष्ठ पत्रकार राजेद्र वाडेकर म्हणाले की, घरकामगार कोणाचे उपकार घेत नाहीत. तर तेही श्रमिक आहेत. त्यांचा आदर त्यांच्या हक्काचे रक्षण आणि त्यांच्या जीवनमानाचा विकास हा समाजाचा आणि शासनाचा दोघांच्या जबाबदारीचा भाग आहे. युवाग्राम संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे महत्व सांगून,प्रशिक्षण घेऊन प्रगती करण्याचे महिलांना आवाहन केले.
स्वागत शायिस्ता शेख, तर आभार अनिता शेलार यांनी मानले. सूत्रसंचलन अमोल सोनवणे यांनी केले.
……
फोटो –
श्रीरामपूर युवाग्राम विकास संस्था
व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे ‘घरेलू महिला कामगारांची कार्यशाळा’ घेण्यात आली.

Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!