राहता हादरले;पती पत्नीच्या वादात संपूर्ण कुटुंबाचा बळी;विहरीत चिमुकल्यांसह पाच जणांचे मृतदेह

श्रीरामपूर-राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील एका विहरीत पाच जणांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.कौटुंबिक वादातून बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी...

श्रीरामपूर-
राहता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील एका विहरीत पाच जणांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.कौटुंबिक वादातून बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना  घडली आहे.पती पत्नीत सुरू असलेल्या वादात चिमुकल्यांचा बळी जाऊन सम्पूर्ण कुटुंबच संपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका विहिरीत पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण काळे (वय ३०) याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून देत स्वतः ही जीवन संपवलं.अरुण काळे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी येवला तालुक्यात निघून गेली होती. तो तिला परत बोलावण्यासाठी सारखे फोन करत होता परंतु ती प्रतिसाद देत नसल्याने अरुणने आपल्या चिमुकल्यांसह आपली जीवनयात्रा संपवली.अरुण काळे याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. शिवानी अरुण काळे (वय ८), प्रेम अरुण काळे (वय ७), वीर अरुण काळे (वय ६) आणि कबीर अरुण काळे (वय ५) अशी मृत मुलांची नावे आहेत. अरुणने या चौघांना विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःचे हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. त्यानंतर विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशन येथे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!