श्रीरामपूर-
२०१६ पासून सुरू झालेल्या भागवत प्रतिष्ठानच्या नेत्रसेवा उपक्रमाने १०१ शिबिरांचा टप्पा पार केला. चार हजार रुग्णांची तपासणी, २८०० मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि हजारो नागरिकांना परत मिळालेली दृष्टी या सेवायात्रेतून ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने उजेडाची कोंदणं फुलत आहेत.भागवत प्रतिष्ठान, स्वस्तिक ग्रुप, पुण्याच्या बुधराणी हॉस्पिटल आणि बेलापूरच्या डॉ. काळे हॉस्पिटल यांच्यातर्फे १०१ वे मोफत मोतिबिंदू व नेत्रतपासणी शिबिर धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे प्रास्ताविकात म्हणाले, २०१६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आजवर चार हजार रुग्णांची तपासणी, तर २८०० मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. बेलापूर-ऐनतपूरसाठी १३६ कोटींची पाणीपुरवठा योजना, साठवण तलावासाठी साडेआठ एकर, ११०० घरकुलांसह नागरी सुविधांसाठी ३४ एकर जागा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोफत दिल्याचेही त्यांनी नमूद केले. नवले म्हणाले, गावकरी मंडळाच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे व शालिनी विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव विकासकामे झाली आहेत. काहींच्या षड्यंत्रामुळे अडथळे येत असले, तरी विकासाची गती अबाधित ठेवली जाईल.यावेळी बुधराणी हॉस्पिटलच्या मीरा पटारे, मनीषा कोरडे, डॉ. सुधीर काळे व डॉ. संपदा काळे यांचा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वस्तिक ग्रुप, सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य, गावकरी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, रुग्ण व नागरिक उपस्थित होते. देविदास देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर खंडागळे यांनी आभार मानले.
