आ.ओगले-ससाणेंनी साधला निवडणूक आयोगावर निशाणा;श्रीरामपुरात काँग्रेसची जोरदार निदर्शने

श्रीरामपूर-विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाद्वारे भाजपाने आपले लोक निवडून आणले आणि त्याच जोरावर सत्ता...

श्रीरामपूर-
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाद्वारे भाजपाने आपले लोक निवडून आणले आणि त्याच जोरावर  सत्ता स्थापन केली या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या साथीने झाल्या असल्याचा आरोप आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे तसेच देशातील काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग अजून गप्प कसे असा सवाल देखील आ. ओगले यांनी केला आहे. श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे म्हणाले की, निवडणूक आयोग हे घरगड्यासारखे काम करत असून एकाच नावाचे असंख्य मतदार नोंदवून तसेच हयात मयत लोकांची देखील यादीत नावे समाविष्ट करून निवडणुका जिंकल्या याचा आम्ही निषेध करत असून निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे ससाणे यांनी म्हटले. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव दिपाली ससाने म्हणाले की, आमचे नेते खा.राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले परंतु निवडणूक आयोगाच्या ऐवजी भाजपाचे प्रवक्ते उत्तर देताना दिसत आहे त्यामुळे हे स्पष्ट होते की केंद्रातील सरकार हे बोगस मतदानांमुळेच सत्तेवर आले असल्याचे सांगितले.यावेळी सचिन गुजर, बाबासाहेब दिघे,  सभापती सुधीर नवले,  ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले,शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर नगरसेवक दिलीप नागरे,वंदना मुरकुटे, अशोकभाई बागुल, रितेश रोटे, महांता यादव, सौ संगीता मंडलिक, मुन्ना पठाण, के सी शेळके,कलीम कुरेशी, नजीर मुलानी, मार्केट कमिटीचे संचालक राजू चक्रनारायण, राणी देसरडा, अशोकराव बागुल, शंकरराव फरगडे, प्रवीण नवले, रितेश एडके,डॉ. राजेंद्र लोंढे,सरवर अली मास्टर, जावेद शेख, मिथुन शेळके, अशोक जगधने, सुरेश दुबे, सुनील साबळे, रियाज खान पठाण, वैभव पंडित, प्रताप कवडे, अतुल खरात, अमोल आवटे, भैय्या भाई अत्तार, रितेश चव्हाणके,सरबजीत सिंग चुग, शाहरुख शेख, अमोल नाईक, सनी मंडलिक, वैभव कुऱ्हे, जाफर शहा, रजाक  पठाण, प्रशांत राऊत, अतिश देसरडा, गणेश काते, कुणाल पाटील, शुभम पाटील, युनूस पटेल, बाबा वायदंडे, शहानवाज बागवान, विशाल साळवे, राजेंद्र भोसले, राजेश जोंधळे, बबलू पठाण, संजय गोसावी, जियान पठाण, तीर्थराज नवले, आकाश जावळे, कल्पेश पाटणी, सागर दुपाटी, प्रशांत आल्हाट, सिमोन चूग, सागर दुपाटी, शिवतेज गोसावी आदी काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

निवडणूक आयोगाचे घरगड्यासारखे काम-ससाणे
निवडणूक आयोग हे घरगड्यासारखे काम करत असून एकाच नावाचे असंख्य मतदार नोंदवून तसेच हयात व मयत लोकांची देखील यादीत नावे समाविष्ट करून मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी करून बोगस मतदानाला एक प्रकारे प्रोत्साहन दिले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!