तुमच्या ताटातले काढुन दुसऱ्याला देणार नाही-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे;अकोले येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विराट रॅली व शेतकरी मेळावा

श्रीरामपूर-आदिवासी समाजाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे तुमच्या ताटातले काढून घेण्याचे काम सरकार अजिबात करणार नाही. तसेच राघोजी...

श्रीरामपूर-
आदिवासी समाजाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे तुमच्या ताटातले काढून घेण्याचे काम सरकार अजिबात करणार नाही. तसेच राघोजी भांगरे आणि राया ठाकर यांच्या स्मारकांची दुरुस्ती करण्यासाठी जो निधी लागेल तो नक्की देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले येथे काढण्यात आलेल्या आदिवासी समाजाच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन त्यानंतर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. या विराट रॅलीमध्ये ठिकठिकाणी फुले उधळून उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच जागोजागी लाडक्या बहिणींनी शिंदे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे, डॉ.जालिंदर भोर, कमलाकर कोते, जगन देशमुख, बाळासाहेब भोर, सुशांत गजे, संजय वाघचौरे, शर्मिला येवले, संजय जाधव, जावेद जहागिरदार, सुभाष येवले, महेश देशमुख आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक मारुती मेंगाळ तसेच शिवसेना सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि आदिवासी बंधू भगिनी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,जागतिक आदिवासी दिन हा या समाजासाठी दसरा दिवाळीसारखा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मी इथे आलो आहे.आपली ही संस्कृती हाच आपला अभिमान आहे. त्याचे दर्शन आज इथे पहायला मिळाले. त्यामुळे आपल्याला थांबविणारी कोणतीही शक्ती नाही, असे यावेळी त्यांनी  निक्षून सांगितले.विधानसभा निवडणूक आपण जिंकणार आणि यांना (एकनाथ शिंदे) जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू हे सगळं ते बोलले. मात्र, माझ्या आदिवासी समाजातील लाडक्या बहिणींनी त्यांच्या चारी मुंड्या चित करून टाकल्या. महाविकास आघाडीला घरी पाठवून दिलं,” अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना करुन दिली.
पक्षाचा मुख्य नेता म्हणून मारुती मेंगाळ यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असून त्यांना कोणतीही अडचण आल्यास नक्की दूर करू तसेच  त्यांनी मागणी केल्यानुसार मालुंगे सोंगाळवाडी येथील प्रलंबित कामेही नक्की पूर्ण केली जातील, या वाडीचे नक्की पुनर्वसन केले जाईल. तसेच त्यांनी केलेल्या इतर मागण्यांवर शासनस्तरावर नक्की निर्णय घेऊ असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!