पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे...

श्रीरामपूर-
आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी मा.आ.बाळासाहेब थोरात यांना त्यांचे नाव न घेता लगावला.राहाता तालुक्यातील मोरवाडी येथे निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन मा. खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार तसेच पेढे तुला करण्यात आली. डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रमास वाल्मीक मोरे, संजय चोळके, सविता चोळके, सुनीता मोरे, मनीषा मोरे, निलेश मोरे, नंदू शेळके, मीनानाथ दरेकर, धोंडीराम मोरे, रायबली मोरे, राजेंद्र पठारे, संतोष गोरडे, नंदू गव्हाणे तसेच शासकीय अधिकारी, गावातील ग्रामस्थ आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम रक्षाबंधनाच्या दिवशी ठरवण्यात आल्याने गावातील बहिणींना डॉ. विखे पाटील यांनी राखीपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की,लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक भागात पाणी पोहोचवण्याचे पाहीलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे यश आज पाहायला मिळत असून, शिर्डी मतदार संघातील  प्रत्येक गावात  जलपूजन करण्याचा आनंद खूप मोठा आहे.

2009 ते 2014 या काळात मोरवाडीत मतदान होत नव्हतं. पाणी मिळाल्याशिवाय मतदान करणार नाही, असा इथल्या ग्रामस्थांचा निर्धार होता. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर या भागात पाणी आणण्यात यश आलं. याचे श्रेय स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाला जातं.”ते पुढे म्हणाले, निळवंड्याचं पाण्याचे”हे यश मिळवण्यात स्वर्गीय पिचड साहेब यांचे सहकार्य मोलाचे होतेच, पण  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यामातून केलेव्या पाठपुराव्याचे योगदान महत्वपूर्ण आहे. ‘पहिले दहा किलोमीटर कालवा पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही’ असा ठाम निर्णय महायुती सरकारने घेतल्यामुळेच अशक्य वाटणारे काम शक्य केलं.माझं काम म्हणजे युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव, दुधाला योग्य दर मिळवून देणं. सत्ता आली-गेली तरी काम सुरू राहायला हवं. सर्वसामान्य लोकांचे आपण कामे केली पाहिजेत वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना आपण प्रत्येक घरोघरी पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. मोरवाडी पंचक्रोशीतील गावांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून  “पाणी आपल्या गावात कधी येईल का या प्रश्नाला उतर मिळाल आहे. 40 वर्षांची प्रतीक्षा संपली. मंत्री   विखे पाटील आणि डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरवाडी पंचक्रोशीतील गावांना पाणी आले. विखे परिवाराचे आम्ही कायम ऋणी राहू,” असे भावनिक उद्गार गावाच्या सरपंच सविता चोळके यांनी काढले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!