आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;संतशक्ती पाठीशी उभी राहिल्याने विजय सुकर;श्री क्षेत्र देवगाव शनी  येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

श्रीरामपूर-नितीन शेळके
लोकसभा निवडणूकित आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग झाला.काही मूठभर लोकांनी राष्ट्रीय व अध्यात्मिक विचार संपवण्याचा विडाच उचलला होता. ही मंडळी संतांच्या विचारांनाही नष्ट करू पाहत होती. मात्र आमच्यासाठी संतशक्ती मैदानात उतरल्यामुळे आम्हाला
विजय मिळाला.सरकारे येतात व जातात खुर्ची आज आहे उद्या नसेल परंतु हा आपला देश व धर्म कायम राहिला पाहिजे,अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
श्री क्षेत्र देवगाव शनी (ता.वैजापूर) येथे १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यातील काल्याच्या किर्तनावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार रमेश बोरणारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खाताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, हे केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक आक्रमण आहे.या विरोधात रामगिरी महाराजांनी चेतना जागवली. संत परंपरेच्या प्रेरणेतून समाजात नवा उमेदीचा स्फोट झाला. ही आध्यात्मिक शक्ती सुविचार देते, राष्ट्रभावना जागवते. आपल्याला असता जातीभेद विसरून एकसंघ व्हावे लागेल. देश, धर्म, आणि परंपरा टिकवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. काही लोक समाजाला फोडण्याचे प्रयत्न करत आहेत. अशांना उत्तर देण्यासाठी संत विचारांची मशाल महत्वाची ठरेल.

श्री क्षेत्र देवगाव शनी येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यातील काल्याच्या किर्तनावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी येतोच.हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता पुढच्या वर्षी सप्ताहात येताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी येतो आणि सोबत अजितदादांनाही घेऊन येतो, असे सूचक विधान केले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सप्ताहाची द्विशताब्दीकडे वाटचाल सुरू आहे. २००० साली लोणीचा सप्ताह स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केला होता. तो सप्ताह जसा भव्य दिव्य झाला तसाच हा सप्ताह त्या पेक्षाही मोठा झाला. सनातन हिंदू धर्म परंपरा जोपासनेचे कार्य यातून सुरू आहे. ‘अवघा रंग एकचि झाला’ असा हा योग आहे. देवगाव शनी बंधाऱ्याची आमच्या भागातील शेतकऱ्यांची मागणी मान्य करा असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आम्हाला सभा घ्यायची म्हटली की कित्येक अडचणी व कसरत करावी लागते. परंतु, इथे होणारी गर्दी ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे. म्हणून मी तीन वर्षांपासून सतत आपल्या दर्शनासाठी येत आहे. जी कामे सांगितले ते सर्व करू. येथे विकास होणे गरजेचे आहे. हे आपल्या धर्माचे सरकार आहे. अयोध्यात राम मंदिर डौलात उभे केले.
स्वागत व प्रस्ताविक करताना आमदार रमेश बोरणारे म्हणाले, देवगाव शनी परिसरातील शेतकर्यांच्या वतीने मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना विनंती करतो की, देवगाव शनी बंधारा घोषणेची प्रतीक्षा करतोय, तो मंजूर करावा. आभार दिनेश परदेशी यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महंत रामगिरी महाराज यांनी सन्मान केला.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच
ज्यांनी आम्हाला निवडून दिलं, त्या लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांना कधीच पश्चाताप होणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला न्याय दिला जाईल. हे सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिदेवगाव येथे केलं.

काल्याच्या कीर्तन प्रसंगी उपस्थित असलेला भाविकांचा अलोट जनसागर

Leave a Comment

संबंधित बातम्या

पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी

पुणे- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर स्टेशनला थांबा द्या;आ.हेमंत ओगले यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-नव्याने चालू झालेल्या पुणे - नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सदर पत्रात नमूद

श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार

सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक

दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व नोकरी करिता बॅटरीवरील सायकल प्रदान;मा.खा.डॉ.सुजय विखे यांचे विशेष सहकार्य

श्रीरामपूर-डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज श्रीरामपूर येथील कु.दर्शना पापडीवाल या दिव्यांग

सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ परत;नेवासा पोलीसांनी विधिवत केले परत

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी

Latest News

Trending News