खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांचे अनुभव विचारा-मा.खा.डॉ. विखे यांचा खोचक टोला;अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन

श्रीरामपूर-माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ...

श्रीरामपूर-
माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ काढून त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा अनुभव व त्यांचे दुःख विचारा,असा खोचक टोला मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज श्रीरामपूरात कुणाचेही नाव न घेता लगावला.परंतू त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे उपस्थितांच्या लक्षात आले.आज अशोकनगर फाटा ते अशोकनगर या ५० लाख रूपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गिरीधर आसने, दिपक अण्णा पटारे, बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, संजय फंड, जितेंद्र छाजेड, शरद नवले, पोपटराव जाधव, विठ्ठलराव राऊत, गणेश मुदगुले, अक्षय राऊत, शामलिंग शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, श्रीरामपूर तालुका आणि विखे पाटील कुटूंबाचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आणि प्रेम आहे. या विश्वासाला आणि या प्रेमाला कदापि तडा जाऊ देणार नाही.विरोधकांमध्ये धमक असेल तर त्यांनी काय काम केले? ते सांगावे. नुसती चिखलफेक करू नये.आम्ही काय केले नाही, ती टिका फक्त करू नका. चिखलफेक करण्यापेक्षा श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा अनुषेश भरून काढण्यासाठी मदत करा. माझ्यावर भविष्यात टिका होणार आहे.मीही त्याला जशाच तसे उत्तर देईल. स्व. बाळासाहेब विखे पाटील, स्व. जयंतराव ससाणे व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकत्रित श्रीरामपूरचा विकास सुरू केला होता. परंतु, त्यानंतर १५ वर्षे हा तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहीला. खंडकऱ्यांच्या वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ केल्या. जमीन वाटपाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी आजच दीड कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली. येत्या पुढील सहा महिन्यात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
प्रवरा उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्याच्या आणि त्याच्या पोटचाऱ्या यांच्या नूतणीकरणासाठी २५० कोटींचा निधी जलसंधारणमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून हे काम होणार आहे.

अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनप्रसंगी बोलताना मा. खा.डॉ.सुजय विखे पाटील.

आज छोटया गोळ्या पुढे डोस वाढवू
मी डॉक्टर असल्याने एकदम जर डोस वाढवला तर पेशंट कोमात जातो हे मला माहीत आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त बोलत नाही, आज छोटया गोळया दिल्या आहेत, पुढे डोस वाढवू आणि श्रीरामपूर तालुक्यातील पेशंट बरे करू असेही खा. डॉ. सुजय विखे पाटील शेवटी म्हणाले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!