भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण...

श्रीरामपूर-
हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात होते आज ते नाहीत.त्यामुळेच आजची पिढी बिगडत चालली आहे.त्यास शिक्षण संस्था जबाबदार आहे.वाट्सअप व फेसबुक मुळे मनोविकार वाढत आहे. त्याला जबाबदार कोण असा सवाल करत, ते सुधारण्यासाठी अध्यात्म – संस्कृतीची गरज आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.श्री क्षेत्र शनि देवगाव सप्तकुषी येथे गोदातीरी सुरू असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशीच्या  प्रवचन पुष्प गुंफताना महाराज बोलत होते.  परमार्थ हे महाधन आहे, रामनाम रुपी ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत आहे. जगामध्ये कोणी धनवान नाही. लक्ष्मीचा जेथे मोठेपणा चालला नाही, तिथे आपण कोण? सिकंदर जब दुनिया से चला तब दोनो हात खाली थे असे सांगत महाराज म्हणाले, जग जिंकले, कितीही संपत्ती असली तरी आपण काही घेवुन जात नाही. आशेमुळे जिवनात अनेक समस्या निर्माण होतात. आशा ही माणसाला वर्तमानात ठेवत नाही, ती भविष्यात घेवुन जाते.  

आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण व मोबाईलचा वाढता अतिवापर यामुळे मनुष्य दिशाहीन झाला आहे तरुण मोबाईलच्या खेळात व्यस्त झाला आहे,
तरुणाई हा समाजाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे, त्यांनी योग्य मार्गावर चालावे यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे. आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार युवकांनी केल्यास एक संतुलित आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत होईल. असे महाराज म्हणाले याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे, वैजापुरचे आमदार रमेश पा बोरणारे सर, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब,विश्व हिंदू परिषदचे सुनील धनवट,कमलाकर कोते, राजेंद्र सांळुके,मनाजी मिसाळ,कडुभाऊ काळे, बाळासाहेब कापसे बाबासाहेब चिडे रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज, विश्वनाथ गिरीजी महाराज, अर्जुन महाराजविकम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,यांच्यासह लाखो भाविकाची उपस्थित होते

सदगुरु गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशी प्रवचन पुष्प गुंफताना महंत रामगिरी महाराज.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!