कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार...

श्रीरामपूर-

‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या निमित्ताने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.याप्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.कार्यालयाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगनजी भुजबळ, मंत्री श्री. नरहरीजी झिरवाळ, मंत्री श्री. माणिकरावजी कोकाटे, खासदार श्री. भास्करराव भगरे, आमदार श्री. दिलीप बनकर, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार श्री. आशुतोष काळे, श्री. काशिनाथ दाते, आमदार श्री. अमोल खताळ, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातुन दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जलसंपदा विभागाने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांना नवसंजीवनी मिळणार आहे.जलसंधारण, शेती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनमान उन्नतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. हे पाऊल म्हणजे “एक महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र” या ध्येयाच्या दिशेने घेतलेली ठोस वाटचाल आहे,असेही ते शेवटी म्हणाले.

नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!