आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का...

श्रीरामपूर-
मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात या सर्वांना अडकवून ठेवून भगवा दहशतवाद असतो,असे दाखवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला.परंतु आज त्या सर्वांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.त्याबद्दल न्यायालयाचेही महंत रामगिरी महाराज यांनी आभार मानले.देवगाव शनी व सप्तक्रोशीत गोदावरी नदीतीरी सुरू असलेल्या सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या प्रवचन पुष्पावर ते बोलत होते.महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की,न्याय मिळाला परंतु दुर्दैव हे आहे की तो मिळवण्यासाठी त्यांना 17 वर्ष वाट पाहावी लागली.तसेच अपराध नसतानाही त्यांना 9 वर्षे तुरुंगात राहावे लागले.साध्वी प्रज्ञासिंह यांना प्रताडणा सहन करावी लागली.या प्रकरणाच्या पाठीमागे असलेल्या राजकीय नेत्यांनी हिंदू देखील आतंकवादी असतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

महंत रामगिरी महाराज

भगवा आतंकवाद शब्द वापरण्याचा प्रयत्न केला.अशा राजकीय लोकांपासून आपण सावध असले पाहिजे.हिंदू धर्म कधीही कुणावर अन्याय करत नाही.तसेच केलेला अन्याय सहनही करत नाही.त्यामुळे भगवा आतंकवाद हा शब्द ज्यांनी वापरला होता त्यांना माझा प्रश्न आहे की,पहलगाम मध्ये जेव्हा धर्म विचारून आतंकवाद्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली त्यांना तुम्ही हिरवा आतंकवाद म्हणू शकता का,ती हिम्मत तुमच्यात आहे का?भगवा आतंकवाद शब्द तुम्ही वापरता मग हिरवा आतंकवाद शब्द वापराल का?
सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी  सप्ताहाच्या माध्यमातून मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण, ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे.या गोष्टींनी आपली चित्ताची शुध्दी होत असते.आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते. नामस्मरणामुळे परमशांती मिळते. निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.भागवत गीतेच्या 11 व्या अध्याय वरील 54 व्या श्लोकावर विवेचन करताना महाराज म्हणाले की,ज्ञानी भक्त भगवंताकडे प्रेम मागतो तर जिज्ञासू उदारता मागतो, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो.सकाळी देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी सप्ताहस्थळी भेट दिली. याप्रसंगी शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, डवाळा आश्रमाचे भरत महाराज, मंहत सोमेश्वर महाराज जालना,जनार्दन महाराज मेटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज,विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्या सह 3 ते 4 लाख भाविकांची उपस्थिती होती.दिवसभर आमटी भाकरीच्या महाप्रसाद सुरू होता.

178 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या प्रवचन पुष्पावर उपदेश करताना महंत रामगिरी महाराज.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!