आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा...

श्रीरामपूर-
आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळही येऊ देणार नाही,असा इशाराच बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ यांनी दिला आहे.
शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे  सर्वेक्षण करण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे बैठकीत सक्त आदेश दिला होता.त्या आदेशाच्या अनुषंगाने आज दिनांक 31 जुलै रोजी बारा वाजता वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोटे उपाधीक्षक भुमिअभिलेख रवींद्र खरोटे नगर अभियंता सूर्यकांत गवळी अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागेची स्थळ पाहणी करण्यासाठी येत असता आमदार हेमंत ओगले यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलून घेतले.त्यानंतर त्यांना आमदार ओगलेनी त्यांच्या सरकारी गाडीतून उतरून आंबेडकरी जनतेला देखावा करण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसून डॉ.आंबेडकर पुतळ्याकडे  घेऊन आले. तिथे अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करू न देता व्हिडिओ शूटिंग तसेच  फोटोसेशन करून माध्यमांना बाईट देऊन जणू काही आपणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परवानगीसाठी पुढाकार घेत आहोत असा देखावा करण्याचा प्रयत्न करून निघून गेले. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ या झालेल्या प्रकारामुळे आमदार हेमंत ओगलेंचा तीव्र निषेध केला.त्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा दोन तासाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन स्थळपाहणी करून जागा निर्वाणीकरण झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे सुपूर्त केला आहे.त्यामुळे जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला. त्याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा  पूर्णाकृती बसवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचे युद्धपातळीवरून काम चालू असून यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लक्ष घालून त्यांचे स्वीय सहाय्यक अंजाबापू गोल्हार, पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी गेली सात-आठ महिन्यापासून अनेक अडचणी दूर करून पुतळ्याच्या जागेचे काम प्रगतीपथावर आणले आहे.यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास  बिहानी, संतोष मोकळ, चरण त्रिभुवन, दादासाहेब बनकर, संजय रूपटक्के, अमोल काळे, बाळासाहेब हिवराळे, विशाल सुरडकर, भाऊसाहेब खरात, दत्ता खेमनर, भैय्या भिसे,संजय गांगड, सतीश सौदागर,बंडू शिंदे, संजय बोरगे आदी उपस्थित होते.

जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमवेत सुभाष त्रिभुवन,
यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास  बिहानी आदी.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!