धार्मिक कार्यक्रमासाठी आलोय,त्याबद्दलच विचारा-कृषिमंत्री कोकाटे;पत्रकारांनी गराडा घातल्यावर कृषीमंत्री कोकाटेंचा सावध पवित्रा

श्रीरामपूर-नितीन शेळके‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या...

श्रीरामपूर-नितीन शेळके
‘राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद’ असे समीकरणच जणू काही गेल्या काही दिवसांपासून बनले आहे. त्यामुळे कोकाटे हे नेहमी त्यांच्या विरोधकांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहेत.वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी अडचणीत येत राहिले.
विधिमंडळात रमी खेळण्याचा त्यांचा समोर आलेला कथित व्हिडीओ असो की आपल्याच कृषी खात्याला ‘ओसाड गावची पाटीलकी’ असे संबोधणे असो किंवा अगदी कालपरवा आपल्याच सरकारला ‘भिकारी’ म्हणून हिणवणे असो,कृषीमंत्री कोकाटे हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेलेच राहिले. त्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचिही चांगलीच नाराजी ओढवून घेतली. ती इतकी की कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामाच घेतला जाईल, आणि त्यांना दुसरे एखादे खाते दिले जाईल किंवा अगदीच जबाबदारीतुन ‘मोकळे’ केले जाईल इथपर्यंत चर्चा माध्यमातून रंगायला लागल्या. परंतु या सर्व वादग्रस्त घडामोडींनंतर खुद्द कृषीमंत्री कोकाटे यांनीच अजित पवार यांच्यापुढे पडदा टाकून दिलगिरी व्यक्त केल्याचे बोलले जाते.

देवगाव शनी येथील 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे.

त्यानंतर कोकाटे हे आज थेट मुंबईहून शनी देवगाव (ता. वैजापूर) येथे 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते. सहाजिकच कृषिमंत्री कोकाटे यांना पत्रकारांचा गराडा पडला. परंतु त्यांनी आज अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करत मी महंत रामगिरी महाराज यांनी दिलेल्या निमंत्रणावरून मी येथे आलो आहे आणि हा धार्मिक सोहळा आहे तेव्हा आपण (पत्रकार) मला त्याबद्दलच प्रश्न विचारा, अशी विनंती केली.यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, मागील वर्षी माझ्या मतदारसंघात पांचाळे येथे १७७ व्या सप्ताहाचे आयोजन केले गेले होते. सालाबादप्रमाणे यंदा १७८ व्या सप्ताहासाठी मला महंत रामगिरी महाराज यांनी वैयक्तिक निमंत्रण दिले होते. त्यामुळे या ठिकाणी येणे क्रमप्राप्त होते.आमच्या वारकरी संप्रदायाचे सप्ताह हे श्रद्धास्थान आहे.लाखो भाविक याठिकाणी येतात.यास अनन्यसाधारण असे महत्व आहे.माझे येथे येणे झाले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.येथील आ. रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने नक्की यशस्वी होईल,असेही कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे शेवटी म्हणाले.

कृषीमंत्री ना.माणिकराव कोकाटे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!