‘संविधान का बदलावे’ पुस्तकाच्या लेखक व आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा;सर्वपक्षांची मागणी

श्रीरामपूर –संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे...

श्रीरामपूर –
संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक व त्या पुस्तकाच्या प्रकाशन  सोळाव्यास उपस्थित राहणाऱ्या आयोजकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या “संविधान का बदलावे” या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखक व प्रकाशन सोहळ्याचे आयोजक यांच्यावर देशद्रोह (IPC कलम 124A) व इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची  मागणी  करण्यात आली आहे.
दिनांक 26 जुलै 2025 रोजी नवी पेठ, पुणे येथील पत्रकार भवन येथे ॲड. शिवाजी कोकणे लिखित “संविधान का बदलावे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारतीय संविधानाबद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्यात आली तसेच संविधानाबाबत चुकीचा अपप्रचार पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला  आहे त्या दोषींवर देशद्रोहाचा पुन्हा दाखल  करून कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात स्वरूपाचे मोठमोठे आंदोलन होतील याची सरकारने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. यावेळी राहुल शहाणे, एजाज पठाण,विशाल सुरडकर, अमोल काळे, विलास जाधव, श्रीराम निकुंभ, विशाल थोरात, आशिष मोरे, गणेश पालकर, गौस तांबोळी,योगेश जाधव, दादासाहेब बनकर, रमेश ढाकणे, अमित कुसुमकर,जावेद अत्तार, अविनाश सुपेकर,ताया शिंदे, प्रदीप निकुंभ, बिलाल आतार, मोजेस चक्रनारायण आधी उपस्थित होते.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,या मागणीचे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मेढे निरीक्षक यांना देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!