टिळकनगर इंडस्ट्रीजबाबतच्या आ.ओगले यांच्या भूमिकेचा निषेध-बेग;कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेणार

श्रीरामपूर –टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेचा आपण निषेध करत असून प्रदुषणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. होणारे प्रदुषण...

श्रीरामपूर –
टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेचा आपण निषेध करत असून प्रदुषणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकऱ्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिले.टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरुन आ. हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल परिसरात अनेक संघटनांकडून तीव्र आंदोलन सुरु आहे. टिळकनगर इंडस्टीजमुळे अनेक कामगारांचे कुटुंब व्यवस्था अवलंबून असून आधारीत उद्योगांवर अनेक लोकांचे संसार सुरु आहेत. आ. हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे. अनेक कामगारांची रोजीरोटी कारखान्यामुळे सुरु आहे. कारखाना बंद करण्याची भूमिका घेतल्यास बेरोजगारीची समस्या निर्माण होणार आहे.कारखान्याच्या प्रदुषीत पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हे खरे आहे. त्या विरोधात शेतकरी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलने करून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. एका बाजूला कारखाना सुरु राहीला पाहिजे, नोकऱ्या व रोजगार टिकला पाहिजे. दुसऱ्या बाजूला प्रदुषणग्रस्थ शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, होणारे प्रदुषण कसे कमी करता येईल, शेतकर्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेवून दोनही घटकांना न्याय मिळेल, याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे बेग यांनी सांगितले.

आ.हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चूकीची असून त्याचा निषेधच आहे. त्यामुळे अनेकांचे प्रपंच धूळीस मिळतील, नागरीकांवर उपासमारीची वेळ येईल टिळकनगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे मागील ३०-३५ वर्षांपासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे,असे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी म्हटले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!