नाफेड मार्फत 25 रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करा;छावा संघटनेची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति...

श्रीरामपूर-
सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर वाढत नसल्याने तसेच साठवणुकीत कांद्याला कोंब येऊन तो सडू लागल्याने प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कांदा भाववाढीसाठी उपयोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा.बाजारसमितीमध्ये ही खरेदी न करता थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या एकूण कांद्यापैकी 60 टक्के कांदा जागेवर खरेदी करावा.नाफेडने चालू बाजार भावने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.बाजारसमिती मध्ये खरेदी केल्यास व्यापारी आपला मला नाफेडला देतील. त्यातही शेतकऱ्यांना काहीही पदरात पडत नाही. म्हणून कांदा थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या चाळीतून कृषी विभागाच्या मदतीने खरेदी करावा. तसेच कांदा निर्यातवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून राज्य सरकार मार्फत प्रयत्न करावेत.राज्यातील जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,तालुकाध्यक्ष राहुरी अमोल वाळूज,अक्षय पटारे, गोवर्धन गोरे, राजेंद्र भिंगारे, बाबासाहेब भणगे यांनी केली आहे.

छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!