नाफेड मार्फत 25 रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करा;छावा संघटनेची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति...

श्रीरामपूर-
सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर वाढत नसल्याने तसेच साठवणुकीत कांद्याला कोंब येऊन तो सडू लागल्याने प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कांदा भाववाढीसाठी उपयोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा.बाजारसमितीमध्ये ही खरेदी न करता थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या एकूण कांद्यापैकी 60 टक्के कांदा जागेवर खरेदी करावा.नाफेडने चालू बाजार भावने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.बाजारसमिती मध्ये खरेदी केल्यास व्यापारी आपला मला नाफेडला देतील. त्यातही शेतकऱ्यांना काहीही पदरात पडत नाही. म्हणून कांदा थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या चाळीतून कृषी विभागाच्या मदतीने खरेदी करावा. तसेच कांदा निर्यातवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून राज्य सरकार मार्फत प्रयत्न करावेत.राज्यातील जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,तालुकाध्यक्ष राहुरी अमोल वाळूज,अक्षय पटारे, गोवर्धन गोरे, राजेंद्र भिंगारे, बाबासाहेब भणगे यांनी केली आहे.

छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!