नाफेड मार्फत 25 रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करा;छावा संघटनेची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-
सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर वाढत नसल्याने तसेच साठवणुकीत कांद्याला कोंब येऊन तो सडू लागल्याने प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कांदा भाववाढीसाठी उपयोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा.बाजारसमितीमध्ये ही खरेदी न करता थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या एकूण कांद्यापैकी 60 टक्के कांदा जागेवर खरेदी करावा.नाफेडने चालू बाजार भावने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.बाजारसमिती मध्ये खरेदी केल्यास व्यापारी आपला मला नाफेडला देतील. त्यातही शेतकऱ्यांना काहीही पदरात पडत नाही. म्हणून कांदा थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या चाळीतून कृषी विभागाच्या मदतीने खरेदी करावा. तसेच कांदा निर्यातवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून राज्य सरकार मार्फत प्रयत्न करावेत.राज्यातील जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,तालुकाध्यक्ष राहुरी अमोल वाळूज,अक्षय पटारे, गोवर्धन गोरे, राजेंद्र भिंगारे, बाबासाहेब भणगे यांनी केली आहे.

छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News