‘अशोक’ दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव संस्था-मा.आ.कांबळे; डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजचे उद्घाटन संपन्न

श्रीरामपूर-  
दर्जेदार शैक्षणिक संधी आपल्या ग्रामीण भागात  उपलब्ध करण्यासाठी ‘अशोक’ कायम प्रयत्नशील आहे. नावारूपास आलेली ही संस्था पदवीचे परिपूर्ण शिक्षण देण्यास तत्पर असल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखाना संचलित अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी पदवी) चा उद्घाटन समारंभ माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, अशोक कारखान्याचे विद्यमान व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ, माजी चेअरमन सुरेश गलांडे, ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात,  माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके,  कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर शिंदे, आदिनाथ झुराळे, माजी संचालक काशिनाथ गोराणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात माजी आ.श्री. कांबळे पुढे म्हणाले की, बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला तांत्रिक व्यवसायिक शिक्षणाची जोड देण्याकरीता संस्थेचे संस्थापक भानुदास मुरकुटे यांनी या अशोक कारखान्यामार्फत शैक्षणिक संकुलाची उभारणी केली आहे. याप्रसंगी श्री. छल्लारे यांनी सांगितले की, चांगले दर्जाचे उच्च शिक्षण, तंत्र शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठीच्या प्रयत्नांमध्ये श्री. मुरकुटे यांनी कोणतीही कसर सोडली नाही. ज्यामुळे तांत्रिक शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यात झालेली फलनिष्पत्ती दिसून येते.माजी आ.श्री.मुरकुटे म्हणाले की, तांत्रिक शिक्षण हा पदविका आणि पदवी अभ्यासक्रम हे माध्यम शिक्षणाच्या प्रवाहातील बहुस्वीकृत मार्ग आहे. या अशोकच्या संस्थामध्ये पायाभूत सुविधा, मूलभूत शिक्षण, व्यावसायिक ज्ञान व उच्च स्तरावर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भविष्यात पात्र व सक्षम अभियंते निर्माण करणे हे अशोकचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे सहसचिव विरेश गलांडे यांनी केले. या कार्यक्रमास  सिद्धार्थ मुरकुटे,  दत्तात्रय नाईक, संचालक ज्ञानदेव पटारे, रामभाऊ कसार, अमोल कोकणे, निरज मुरकुटे, अच्युतराव बडाख, मयूर पटारे, आदींसह पालक, सभासद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डॉ. मोहितकुमार गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन अरुण कडू व दिलीप खंडागळे यांनी केले. कार्यक्रमास पॉलिटेक्निकचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी पदवी) च्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना माजी आ. भाऊसाहेब कांबळे.

Leave a Comment

संबंधित बातम्या

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

बेलापूर बु. ग्रामपंचायत राबविणार ‘मियावाकी’ वृक्ष लागवड प्रकल्प        

श्रीरामपूर-बेलापूर बुll ग्रामपंचायत जि.प.सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या संकल्पनेनुसार 'मियावाकी' या जपानी पध्दतीने वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवित असल्याची माहिती सरपंच मिनाताई साळवी व

मंत्री विखे पाटलांनी भरली नाथसागराची खणानारळाने ओटी;अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरल्याचे समाधान-ना. विखे पाटील

श्रीरामपूर-कधी काळी या नाथसागर (जायकवाडी) धरणाच्या पाण्यावरून वादाचे प्रसंग आले.पण सर्व गोष्टीना निसर्ग हेच उत्तर.स्व.शंकरराव चव्हाण यांनी अतिशय दूरदृष्टीतून या प्रकल्पाची उभारणी केली.या धरणाच्या निर्मितीत आमच्या बहीणीलाही विस्थापीत व्हावे लागले,अशी आठवण

Latest News

Trending News