राष्ट्रवादीच्या १०० शाखा फलकांचे अनावरण;मा.आ.कानडे यांचा उपमुख्यमंत्री पवारांच्या  वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

श्रीरामपूर-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन श्रीरामपूर मतदार संघातील ८२ गावे व २ नगरपालिका हददीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० शाखा फलक लावण्याचा संकल्प केला होता. आज ग्रामीण भागातील बहुतांशी गावामधे या फलकांचे अनावरण करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावपातळीवर अधिक बळकट करण्याचा उद्देश त्यात असल्याचे मा. आ.लहू कानडे यांनी सांगितले.कानडे पुढे म्हणाले की,या उपक्रमामुळे श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बळ वाढणार आहे. आगामी निवडणुकांसाठी मजबूत पायाभरणी या माध्यमातून करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले. अनेक युवक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला भगिंनी  आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.

श्रीरामपूर मतदार संघातील बहुतांशी गावामधे मा. आ.लहुजी कानडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांचे अनावरण करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्दिष्ट गावपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बळकट करणे हे असून, प्रत्येक गावात स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे फलक अनावरण सोहळे पार पडले.आज बेलापूर, पढेगाव, टाकळीभान,महाकाळ वाडगाव, घुमनदेव, माळेवाडी,  खंडाळा, नर्सरी, कान्हेगाव, उंदीरगाव, कारेगाव वगैंरे ठिकाणी शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी सदर गावातील कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिंनी व ग्रामस्थांची उपस्थिती व  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अरुण पा. नाईक, जिल्हाकार्याध्यक्ष माजी नगरसेवक अशोक कानडे, अक्षय नाईक,सचिन जगताप, सतीश बोर्डे, राजेंद्र कोकणे, दीपक कदम, कार्लस साठे, अक्षय नाईक, चांगदेव देवराय, अजिंक्य उंडे, आशिष शिंदे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News