चांगले काम करताना अडचणी येतातच-आ.ओगले;मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा;श्रीरामपूर बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा

श्रीरामपूर-श्रीरामपूर बाजार समितीने उपबाजार मार्केट निर्मिती करून बाजार समितीचा विस्तार करावा. चांगले काम करत असताना अडचणी येत असतात.आता तर तुमच्याकडे विरोधकच...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर बाजार समितीने उपबाजार मार्केट निर्मिती करून बाजार समितीचा विस्तार करावा. चांगले काम करत असताना अडचणी येत असतात.आता तर तुमच्याकडे विरोधकच नसल्यामुळे चांगले निर्णय घेता येतील.तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन आ. हेमंत ओगले यांनी केले.
श्रीरामपूर बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सभापती सुधीर नवले होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, संचालक सचिन गुजर, राजेंद्र पाऊलबुद्धे, राजू चक्रनारायण, दशरथ पिसे, मयूर पटारे, सोन्याबापु शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, अण्णासाहेब डावखर, प्रमोद भोसले, पंडित बोंबले आदी उपस्थित होते.
आ. ओगले म्हणाले चांगले काम करणाऱ्याला त्रासाला सामोरे जावे लागते. लढणे व संघर्ष करणेही ओघाने येते.बाजार समितीच्या सत्ताधाऱ्या विरोधात 16 याचिका दाखल होत्या.पैकी 13 चा निकाल समितीच्या बाजूने लागला आहे. यावरूनच संघर्षाची जाणीव होते. बाजार समितीत असलेले शेतकरी भोजनालय पुन्हा सुरू करावे. पोलीस चौकी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. राहुरी व नगर येथील कांदा लिलाव कशा पद्धतीने होतात त्याची पाहणी करा. बाजार समितीने रुग्णालय सुरू करण्याची मागणी पुढे आली. बाजार समितीने व अशोक कारखान्याने मनावर घेतले तर रुग्णालयही उभारता येईल.यासाठी सिद्धार्थ मुरकुटे यांनी मार्केट कमिटीच्यावतीने वकिली करावी.एमआयडीसीत नवनवीन उद्योग घेऊन रोजगार वाढीसाठी आपण प्रयत्न केला असून मदर डेअरी या दूध उत्पादन क्षेत्रातील मोठ्या उद्योगाबरोबरही आपली चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले
प्रास्ताविक करताना सुधीर नवले यांनी बाजार समितीला 1 कोटी 55 लाख रुपयांचा नफा झालेला आहे. बाजार समितीचे उत्पन्न 4 कोटी 55 लाख रुपये इतके झालेले आहे. अंतर्गत काँक्रिटीकरण व इतर विकास कामे सुरू आहेत मात्र विरोधकांकडून वारंवार दाखल होणाऱ्या याचिका व तक्रारीमुळे या कामास बाधा येत असल्याचे सांगितले.करण ससाणे म्हणाले बाजार समितीची नेहमीच शेतकऱ्यांना मदतीची भूमिका असते.बाजार समितीने अभ्यास दौरे आयोजित करावे. बाजार समितीत विकास कामांना पणनने मंजुरी दिली नाही तर त्यासाठी न्यायालयात जावे लागते.निळवंडेचे पाणी सोडल्यानंतर जलपूजन व श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसून येते. मात्र या भागातील शेतकऱ्यांनी किती सात नंबरचे फॉर्म भरले हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. त्यामुळे आगामी काळ संघर्षाचा असून हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे.अहवाल वाचन सचिव साहेबराव वाबळे यांनी केले.सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. यावेळी कांदा उत्पादक, भाजीपाला उत्पादक, व्यापारी, आडते,गाळेधारक यांचा मान्यवरांच्या हस्ते येथे गौरव करण्यात आला.

श्रीरामपूर बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना आ. हेमंत ओगले
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!