श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न; डॉ.आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी;पोलिसांनी हस्तक्षेप करून अनर्थ टाळला

श्रीरामपूर –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात उभारण्यात यावा, या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज काळे यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले.
डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मागणीची दखल घेत नसल्याचा आरोप मनोज काळे यांनी केला.या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘बाबासाहेबांचा पुतळा हे फक्त प्रतीक नसून सामाजिक स्वाभिमानाचे आणि हक्काच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे,’अशी घोषणाबाजी केली.मनोज काळे यांनी मागील काही महिन्यांपासून विविध स्तरांवर आंदोलने केली होती. उपोषण, निवेदनं, मोर्चे, पत्रव्यवहार आणि बैठका अशा माध्यमातून त्यांनी आपली मागणी प्रशासनापुढे मांडली.मात्र तरीही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून संभाव्य दुर्घटना टळली. या प्रकारामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, युवक वर्ग आणि आंबेडकरी संघटनांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर पुतळा उभारणीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी उपस्थित आंदोलकांनी ही बाब केवळ एका वर्गाची नव्हे, तर संपूर्ण शहराच्या अस्मितेशी निगडीत आहे. सदर प्रकारानंतर शहरातील विविध सामाजिक संघटना, बुद्धिस्ट सोसायट्या आणि युवक समूह एकत्रितपणे पुढील आंदोलनाची दिशा ठरवत असून प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर डॉ. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यास ताब्यात घेतले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News