प्रकाश चित्ते यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळा; अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांना सर्वपक्षीय निवेदन;चित्तेंवरील गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप

श्रीरामपूर-
हिंदुत्ववादी नेते भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा हा बनावट व राजकीय हेतूने प्रेरित असून या गुन्ह्यातून त्यांचे नाव तात्काळ वगळण्यात यावे अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 678/2025 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकाश चित्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वास असून, हे संपूर्ण प्रकरण एका नियोजित राजकीय षड्यंत्राचा भाग आहे.संबंधित महिलेसोबत प्रकाश चित्ते यांची कोणतीही ओळख नाही. त्या महिलेबाबत कोणताही पूर्वसंपर्क नसताना त्यांच्याविरोधात एक काल्पनिक आणि खोडसाळ प्रकारची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. “ही एक प्रकारची बदनामी मोहीम असून, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न आहे,” असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रकाश चित्ते यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळण्यात यावे अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रकाश चित्ते यांनी यापूर्वी मुल्ला कटर टोळी विरोधात सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने करत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण संघर्ष संपूर्ण शहरास माहित आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर दाखल झालेला हा गुन्हा विरोधकांनी रचलेल्या कटाचा भाग असून, त्यांचे सामाजिक आणि राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षड्यंत्र रचले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मंडईत न बसवता शिवाजी चौकातच बसवावा या मागणीसाठी प्रकाश चित्ते यांनी उघड भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनावर भाजप नेते सुनील मुथा, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सिद्धार्थ मुरकुटे, आर पी आय चे सुरेंद्र थोरात, शिवसेना शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे, भाजप नेते बबन मुठे आम आदमीचे प्रवक्ते तिलक डुंगरवाल, मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबने मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, राजेंद्र सोनवणे, संजय पांडे, किरण लुनिया, मा. नगरसेवक संतोष कांबळे, राजेंद्र कांबळे, राजेंद्र चव्हाण, शिवसेना नेते संजय छल्लारे, संजय राऊत, सुरेश सोनवणे सर, गौतम उपाध्ये, शत्रुघ्न गव्हाणे, गणेश भिसे, संजय यादव आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.

Leave a Comment

संबंधित बातम्या

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

Latest News

Trending News