प्रकाश चित्ते यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळा; अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांना सर्वपक्षीय निवेदन;चित्तेंवरील गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप

श्रीरामपूर-हिंदुत्ववादी नेते भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा हा बनावट व राजकीय हेतूने प्रेरित असून या गुन्ह्यातून त्यांचे...

श्रीरामपूर-
हिंदुत्ववादी नेते भाजपचे प्रकाश चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा हा बनावट व राजकीय हेतूने प्रेरित असून या गुन्ह्यातून त्यांचे नाव तात्काळ वगळण्यात यावे अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 678/2025 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकाश चित्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वास असून, हे संपूर्ण प्रकरण एका नियोजित राजकीय षड्यंत्राचा भाग आहे.संबंधित महिलेसोबत प्रकाश चित्ते यांची कोणतीही ओळख नाही. त्या महिलेबाबत कोणताही पूर्वसंपर्क नसताना त्यांच्याविरोधात एक काल्पनिक आणि खोडसाळ प्रकारची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. “ही एक प्रकारची बदनामी मोहीम असून, त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न आहे,” असेही नमूद करण्यात आले आहे.

प्रकाश चित्ते यांचे नाव गुन्ह्यातून तात्काळ वगळण्यात यावे अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रकाश चित्ते यांनी यापूर्वी मुल्ला कटर टोळी विरोधात सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने करत प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण संघर्ष संपूर्ण शहरास माहित आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर दाखल झालेला हा गुन्हा विरोधकांनी रचलेल्या कटाचा भाग असून, त्यांचे सामाजिक आणि राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षड्यंत्र रचले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजी मंडईत न बसवता शिवाजी चौकातच बसवावा या मागणीसाठी प्रकाश चित्ते यांनी उघड भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनावर भाजप नेते सुनील मुथा, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सिद्धार्थ मुरकुटे, आर पी आय चे सुरेंद्र थोरात, शिवसेना शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडदे, भाजप नेते बबन मुठे आम आदमीचे प्रवक्ते तिलक डुंगरवाल, मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबने मनसे शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, राजेंद्र सोनवणे, संजय पांडे, किरण लुनिया, मा. नगरसेवक संतोष कांबळे, राजेंद्र कांबळे, राजेंद्र चव्हाण, शिवसेना नेते संजय छल्लारे, संजय राऊत, सुरेश सोनवणे सर, गौतम उपाध्ये, शत्रुघ्न गव्हाणे, गणेश भिसे, संजय यादव आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!