मोतिबिंदू शिबिराच्या उपक्रमाची शतकपूर्ती;बेलापूर येथील भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपने जपले सामाजिक भान

श्रीरामपूर-
तालुक्यातील बेलापूर येथील भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे येथील के. के. आय (बुधरानी) हॉस्पीटल, डॉ. काळे हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित मोतिबिंदू शिबिराच्या उपक्रमाने शतक पूर्ण केल्याबद्दल नुकतेच शतकपूर्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपने बुधरानी हॉस्पिटलच्या सहकार्याने तसेच डॉ. सुधीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षांपूर्वी सन २०१६ मध्ये मोतीबिंदू तपासणी शिबिराच्या उपक्रमास प्रारंभ केला. या शिबिरात ज्या रुग्णांचे मोतीबिंदू निदान होईल. त्यांच्यावर पुणे येथील बुधरानी हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येतात. आजवर हजारो गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

बेलापूर येथील भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोतिबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचे शंभरावे शिबिर बेलापूर मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. संपदा सुधीर काळे यांच्या हस्ते तसेच भागवत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे, डॉ. सुधीर काळे, भगिरथ मुंडलिक, गिरीश परांजपे, बाबासाहेब अमोलिक, बुधरानी हॉस्पीटलच्या मनिषा कोरडे आदींच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. यावेळी अभिषेक खंडागळे यांनी सदरच्या उपक्रमाच्या शातकपूर्तीचे श्रेय स्वस्तिक ग्रुपचे सदस्य डॉ. सुधीर व डॉ. संपदा काळे, बुधरानी हॉस्पीटल यांना दिले. तसेच यापुढेही हा उपक्रम राबविला जाईल, असे सांगितले. गेली नऊ वर्षे सातत्य राखून मोतीबिंदू शिबिराची शतकपूर्ती केल्याबद्दल अनेकांनी खंडागळे परिवार, स्वस्तिक ग्रुप, डॉ. काळे परिवार तसेच बुधरानी हॉस्पीटलच्या संचालकांचे कौतुक केले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

Latest News

Trending News