विस्थापितांना पाच फुटांच्या जागेबाबत निर्णयाच्या सूचना;पालकमंत्री विखे पाटलांच्या अभिनंदनाचा ठराव;श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीची बैठक

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील अतिक्रमण कारवाईमुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिक व व्यापाऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचे पुनर्वसन करून विस्थापितांना पाच फुटाची जागा देण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश केले आहेत,असे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विस्थापितांना आश्वस्त केले असल्यामुळे श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने त्यांच्या अभिनंदनचा ठराव टाळ्याच्या गजरात एकमताने आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता
शासकीय विश्रामगृह या ठिकाणी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन अध्यक्ष अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.रविवार दिनांक 13 जुलै रोजी श्रीरामपूर नगर परिषद यशवंतराव सभागृह या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी गेली सहा महिन्यापासून नगरपरिषदेने दुकानदारांचे अतिक्रमण काढून त्यांना विस्थापित केले आहे. त्या विस्थापित दुकानदारांना नेवासाच्या धरतीवर पाच फुटाची जागा देऊन पुनर्वसन करावे अशी विनंती केली होती.त्यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी पुनर्वसन करून विस्थापितांना पाच फुटाची जागा देण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश केले.प्रांताधिकारी किरण सावंत तसेच मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना विस्थापित व्यापाऱ्यांना पाच फुटाची जागा व्यापार करण्यासाठी देण्यासंदर्भात दोघांनी बसून त्वरित निर्णय घ्यावा असे आदेश त्यांनी केल्यामुळे विस्थापित व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
बैठकीच्यावेळी किशोर ओझा शरीफ शेख कैलास बाविस्कर विजय छाजेड सलगर पिंजारी शाहरुख मन्सुरी रईस शेख श्रीराम निकुंभ असलम अत्तार असिफ मणियार राजेश श्रीवास्तव सुदर्शन देवकाते प्रदीप निकम रिंकू लुल्ला राकेश थोरात वणेश तुवर आशिर सय्यद दिलीप फरगडे मुनीर शेख विशाल  सावद्रा शाहरुख बागवान सद्दाम बागवान वसीम बागवान शाहिद बागवान किरण कतारे बाबूलाल मांडल प्रेम शिंदे किशोर परगडे प्रशांत सूर्यवंशी गौतम गादिया भारत जगताप सलमान शहा मनोज गायकवाड गोविंद ढाकणे ताया शिंदे हरीश आछडा सोमनाथ सोनवणे किशोर नागरे गोविंद ढाकणे लखन वदवाणी बाबासाहेब मोरगे संजय शेलार भागवत संत सुमनबाई बनकर संदीप ठाकरे नितीन लांबोळे उत्तम चित्ते पराग कुलकर्णी  पोपट वाघचौरे हरी शिरसागर रज्जाक शेख अक्षय गवळी विठ्ठल जावळे दादाभाऊ कोपरे अवंतिका देवकाते श्रीराम लावर संजय महांकाळे, मलंग शेख  सत्तार पिंजारी जया तरटे बापू सोनवणे विजय चोरमल गुलाब गायकवाड  मस्जिद मेमन आधी उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल शहाणे यांनी केले. आभार किशोर ओझा यांनी मानले.

श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News