उंदिरगाव येथील जागेच्या वादात गलांडेंच्या बाजूनेच निकाल;अपर विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील गट नं.७८ व ७९ या जागेसंबंधी सुरू असलेल्या वादाबाबत नाशिकच्या अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी त्यांच्यासमोर केलेले अपील फेटाळून लावत अहिल्यानगर अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे सदर जागा ही नानासाहेब गलांडे यांचीच असल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, उंदीरगाव येथील गट. नं.७८ व ७९ या जागे संबंधित २०२० पासून वाद सुरु आहे. यावरून अनेक आरोप, प्रत्यारोप करण्यात आले.अहमदनगर यांचेकडील आदेश आरटीएस अपील क्र. ३६९/२०२१ दि. ०३/०३/२०२३, नंतर विभागीय आयुक्त, नाशिक यांचे न्यायालयामध्ये आर.टी.एस. / अपील /पुनरिक्षण/७७९/२०२३ सामनेवाले यांनी अर्ज केला असता तो अर्ज ०२/०७/२०२५ रोजी फेटाळून लावत नानासाहेब गलांडे यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे.अशोक विठ्ठल बांद्रे, विठ्ठल किसन बांद्रे, राजेंद्र पांडुरंग बांद्रे, द्वारकाबाई अंबादास शिरसागर, राजू शब्बीर मणियार, सर्व रा. उंदीरगाव या सर्वांनी नानासाहेब काशिनाथ गलांडे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ प्रमाणे अपील केले असता या वादातील मिळकत उंदीरगाव येथील गट. नं. ७९क/१८ संबंधित श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील बाद फौजदारी वादातील फेरफार क्र
५५८६ दिनांक २०/०५/१९९५ मंजूर नोंदीचे बाबत अर्जदार यांनी विलंब क्षमापन अर्जासह उपविभागीय
अधिकारी, श्रीरामपूर भाग, श्रीरामपूर यांचे न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार प्रस्तुत न्यायालयाने आरटीएस विलंब अर्ज क्र. २४१/२०२० अन्वये कामकाज चालविण्यात येवून वादातील नोंद अव्हानीत करताना सुमारे २५ वर्ष व ७ महिन्यांच्या विलंब झाल्याने दिनांक ०९/०७/२०२१ अन्वये अर्ज नामंजूर करण्यात आला होता. सदर निर्णयावर नाराज होऊन अर्जदार यांनी या अपर विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला.  या संबंधित आदेशात नमूद केले आहे की हा वाद गट. क्र. ७९ बाबत असून वादातील नोंद फेरफार क्रं. ५५८६ ही गट. क्रं. ७८ बाबत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर व अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेले आदेश योग्य व कायदेशीर असल्याने अर्जदार यांचे अपील नामंजूर करत अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेला निकाल कायम करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

नानासाहेब गलांडे यांच्या कन्या योगिता गलांडे म्हस्के यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, संघटित होवून कोणी कितीही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो हे या प्रकरणात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या निकालावरून दिसून येते. अशा प्रकारच्या निकालामुळे न्याय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये विश्वास वाढण्यास निश्चित मदत होईल.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News