नाल्याच्या भूमिगतकरणासह विविध मागण्या मान्य; नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या प्रयत्नांना यश;पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

श्रीरामपूर–
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांतील महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या मांडण्यात आल्या असून, नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिलेल्या निवेदनावर ना.विखेंनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी सभापती दिपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, जि.प.सदस्य शरद नवले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, रवी पाटील, वैशाली चव्हाण, अभिषेक खंडागळे, संजय गांगड, मनोज लबडे, राजू आदिक, सोमनाथ गांगड आदी उपस्थित होते.
शहरातील सांडपाण्याचा उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल दरम्यानचा नाला (चर) हा परिसरातील प्रमुख समस्या आहे. या नाल्याचे सिमेंट काँक्रेटीकरण करून भूमिगत करण्याची मागणी नगरसेविका सौ. स्नेहल खोरे यांनी केली. पालकमंत्री विखे पाटील यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक किरण सावंत व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना प्रस्ताव सादर करून त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
यासोबत नगरसेविका स्नेहल खोरे यांनी भोंगळ वस्तीतील पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्याची, पूर्णवादनगर टीपी रिझर्व्हेशन काढण्याची आणि प्रभागासाठी वाढीव निधी मंजूर करण्याची विनंती केली. या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.  पूर्णवादनगरमधील टीपी रिझर्व्हेशनचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यात अडचणीमुळे स्थानिकांना घरकुल अनुदान मिळण्यास अडथळे येत आहेत. खोरेंच्या प्रयत्नाने येथील डीपी रिझर्व्हेशन रद्द झाले आहे. प्रभागाच्या विकासासाठी केतन खोरे व स्नेहल खोरे या सातत्याने कार्यरत असून त्यांच्यामुळे शहर विकासात हा प्रभाग प्रथमस्थानी आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विजय पाटील, सुदर्शन शितोळे, विजयकुमार शर्मा, मनोज होंड, मनोज नागरे, विवेक भोईर, अनिल उनवणे, प्रमोद कु-हे, मोघले साहेब, बी.एम.पवार, पंकज बनकर, विशाल रुपनर, तुषार चांडवले, महिला शहराध्यक्ष पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण, सीमा पटारे, अलका राऊत, वर्षा भोईर, अनिल पंडित, राहुल सागडे, सीमा पाठक, लता जगताप, मंगल शितोळे, शुभांगी सातपुते, रेखा होते, नूतन माळवे, अग्रवाल भाभी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांतील विकासकामांचे लोकार्पण ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News