एकल महिलांच्या  पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप;श्रीरामपुरात संवेदन उपक्रमांतर्गत संवेदनशीलतेचे दर्शन

श्रीरामपूर –
तालुक्यातील एकल महिलांच्या ८० पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत साऊ एकल समितीने आपल्या विधायक कार्यातून संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. पालिकेच्या आगाशे सभागृहात रविवारी समितीच्या वतीने लोकसहभागातून गणवेश, स्कूल बॅग, वह्या, कंपास, जेवणाचा डबा, पाणी बाटली, टिफिन बॅग असे साहित्य वाटप केले.माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, अध्यक्षा मंजुषा ढोकचौळे, सुदर्शन पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास चव्हाण, माजी नगरसेविका वैशाली चव्हाण, कॉ. जीवन सुरूडे, अजित बाबेल, कैलास खंदारे, भाजपचे माजी शहराध्यक्ष मारूती बिंगले, विजय आखाडे, मेजर कृष्णा सरदार, महेश ढोकचौळे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता शर्मा, कविता दुबे, पूजा चव्हाण, शंभूक वसतिगृहाचे अधीक्षक अशोक दिवे, पत्रकार अनिल पांडे, महेश माळवे, रवी भागवत, संजय दुशिंग आदी उपस्थित होते
एकल महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचा आवाज होण्यासाठी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकारातून राज्यातील ८० तालुक्यात समितीचे जाळे उभे केले आहे. या शैक्षणिक सत्रापासून समितीने एकल महिलांच्या लेकरांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील जाणीव, संवेदना असणाऱ्या व्यक्तींना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.समाजाला एकल महिला व त्यांच्या प्रश्न व कुटुंबाशी जोडून या विद्यार्थ्यांना कौटुंबिक स्नेह आधार मिळवून देणे, हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकु मार साळवे यांनी सांगितले.समितीचे तालुका समन्वयक मुकुंद टंकसाळे यांनी क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेची सविस्तर माहिती दिली. अनुराधाताई आदिक व श्रीनिवास बिहाणी यांनी साऊ समिती एकल महिलांसाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक करून या महिलांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.यावेळी मंजुषा ढोकचौळे, अशोक दिवे, वैशाली चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब जपे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, दिलीप लोखंडे, मुकुंद टंकसाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तालुका समन्वयक श्रीकृष्ण बडाख यांनी स्वागत केले. तालुका समन्वयक दिलीप लोखंडे यांनी आभार मानले

एकल महिलांच्या ८० पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News