क.जे.सोमैया महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करू- ना.विखे पाटील;महाविद्यालयाच्या वतीने नामदार विखे यांना निवेदन

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील हिंद सेवा मंडळाच्या क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालच्या भौतिक,शैक्षणिक व सुशोभीकरणासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन पाटबंधारे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.क.जे.सौमेय्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने चेअरमन रणजित श्रीगोड,शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे यांनी नामदार विखे यांना निवेदन दिले. याप्रसंगी उत्तर अहिल्यानगर चे भाजपा अध्यक्ष नितिन दिनकर,शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र छाजेड माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, अभिषेक पाटील खंडागळे, के. के आव्हाड यांचे सह आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी ना. विखे पाटील म्हणाले, हिंद सेवा मंडळाचे शैक्षणिक विकासासाठी जिल्ह्यात नावलौकीक आहे. या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी तसेच विविध पदावर कार्यरत आहे.क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक, भौतिक विकास तसेच विद्यालयाच्या स्वच्छता गृह, महाविद्यालयासाठी परिसर सुशोभिकरण करण्यासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन दिले.

क.जे.सौमेय्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने चेअरमन रणजित श्रीगोड,शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांना निवेदन दिले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News