श्रीरामपूरचा विजेचा प्रश्न कायमचा सुटणार-आ. हेमंत ओगले*;२२०/३३ के. व्हि वीज उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे सुमारे ५९ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या २२०/३३ के. व्हि उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे सुमारे ५९ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या २२०/३३ के. व्हि उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, सद्यस्थितीत श्रीरामपूर तालुक्याला बाभळेश्वर आणि नेवासा तालुक्यातून वीज पुरवठा होतो त्यामुळे शेतकरी व नागरिकांना उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर वारंवार ओव्हरलोड होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला होता या वीज उपकेंद्रामुळे ती अडचण देखील दूर होणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसी येथे नव्याने उद्योगधंदे येण्यास मदत होईल जेणेकरून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
२२०/३३ के. व्हि उपकेंद्राच्या निर्मितीमुळे श्रीरामपूर विजेच्या बाबतीत समृद्ध होणार असून येणाऱ्या काळात श्रीरामपूर महावितरण कार्यालयाचे विभाजन करून बेलापूर उपकेंद्र मंजूर करावे तसेच महावितरणकडे रिक्त असलेल्या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून मी विधानसभेमध्ये श्रीरामपूर विज केंद्राचा प्रश्न लावून धरला.आज सदर विज केंद्राचा शुभारंभ संपन्न होत आहे. निश्चितच त्याचा फायदा मतदारसंघाला होणार असल्याचे ते म्हटले.राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे देखील आमदार ओगले यांनी आभार मानले आहे.
यावेळी युवा नेते करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रितेश रोटे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, कांतीशेठ पटेल यांच्यासह आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे वीज उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार हेमंत ओगले.

‘कुंभमेळ्याच्या विकासाआराखड्यात शिर्डी – बेलापूरमार्गे शनिशिंगणापूर रस्त्याचा समावेश करा’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासा आराखड्यात शिर्डी – वाकडी- श्रीरामपूर – बेलापूर मार्गे शनिशिंगणापूर रस्त्याचा समावेश करावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असल्याचे आ. हेमंत ओगले यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!