श्रीरामपूरचा विजेचा प्रश्न कायमचा सुटणार-आ. हेमंत ओगले*;२२०/३३ के. व्हि वीज उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे सुमारे ५९ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या २२०/३३ के. व्हि उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार हेमंत ओगले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, सद्यस्थितीत श्रीरामपूर तालुक्याला बाभळेश्वर आणि नेवासा तालुक्यातून वीज पुरवठा होतो त्यामुळे शेतकरी व नागरिकांना उच्च दाबाने वीजपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात अनेक ठिकाणचे ट्रांसफार्मर वारंवार ओव्हरलोड होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला होता या वीज उपकेंद्रामुळे ती अडचण देखील दूर होणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसी येथे नव्याने उद्योगधंदे येण्यास मदत होईल जेणेकरून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
२२०/३३ के. व्हि उपकेंद्राच्या निर्मितीमुळे श्रीरामपूर विजेच्या बाबतीत समृद्ध होणार असून येणाऱ्या काळात श्रीरामपूर महावितरण कार्यालयाचे विभाजन करून बेलापूर उपकेंद्र मंजूर करावे तसेच महावितरणकडे रिक्त असलेल्या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.आमदार झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून मी विधानसभेमध्ये श्रीरामपूर विज केंद्राचा प्रश्न लावून धरला.आज सदर विज केंद्राचा शुभारंभ संपन्न होत आहे. निश्चितच त्याचा फायदा मतदारसंघाला होणार असल्याचे ते म्हटले.राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे देखील आमदार ओगले यांनी आभार मानले आहे.
यावेळी युवा नेते करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रितेश रोटे, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, कांतीशेठ पटेल यांच्यासह आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर येथील एमआयडीसी येथे वीज उपकेंद्राचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार हेमंत ओगले.

‘कुंभमेळ्याच्या विकासाआराखड्यात शिर्डी – बेलापूरमार्गे शनिशिंगणापूर रस्त्याचा समावेश करा’
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासा आराखड्यात शिर्डी – वाकडी- श्रीरामपूर – बेलापूर मार्गे शनिशिंगणापूर रस्त्याचा समावेश करावा अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असल्याचे आ. हेमंत ओगले यांनी सांगितले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News