ख्रिश्चन धर्म स्विकारावा म्हणून महिलेला ठार मारण्याची धमकी;श्रीरामपूरातील गंभीर प्रकार;नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर-
ख्रिश्चन धर्म स्विकारावा म्हणून महिलेला तिच्या नणंद व सासूने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे.तसेच या महिलेला हिंदू धर्माची पूजा करण्यासही मज्जाव करण्यात आल्याने सदर महिलेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले की, वैशाली मंगेश साळवे, वय ३७,रा.गोंधवणी, वॉर्ड नं. १,श्रीरामपूर माझे २००९ मध्ये मंगेश साळवे याच्यासोबत आपले ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले. लग्नाच्यावेळी पती व सासरकडील लोकांनी आपल्याला हिंदू पद्धतीने पुजाअर्चा करण्याची व हिंदू धर्मानुसार राहण्याची परवानगी दिल्याने आपण लग्न केले होते.त्यानंतर पतीही हिंदू धर्म पद्धतीने पुजाअर्चा करायचा. परंतु याचा राग आपल्या मोठ्या नणंद, लहान नणंद, त्यांचा मुलगा, सासू यांना येवून त्यांनी आमच्या घरात हिंदू धर्माची पुजा करायची नाही, देवाची मूर्ती घरात ठेवायची नाही असे बोलून भांडण केले.दोन दिवसांपूर्वी आपण नगरला भरोसा सेल येथे गेलेलो असताना आपल्या नणंद, सासू यांनी आपल्या गोंधवणी येथील घरी जाऊन घरात जबरदस्तीने घुसून घरातील संसारोपयोगी साहित्य एका टेम्पोत भरले.तसेच घरातील देवी-देवतांचे फोटो एका बॅगमध्ये भरून कोठेतरी नेल्याचे आपल्याला फोनवरून मुलाने सांगितले. वैशाली साळवे हिच्या फिर्यादीवरून संध्या सुशील गायकवाड, संगिता आनंद मोरे, शारदा साहेबराव साळवे, ऋषिकेश मोरे यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ हे करीत आहेत.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News