पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा-पालकमंत्री विखे पाटील यांच्या सूचना;श्रीरामपूर शहराच्या १७८ कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाची पाहणी

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेवून महायुती सरकराने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली आहे. १७८ कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करा आशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागां मधील विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.पालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहाणी त्यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत केली.महायुती सरकारने या योजनेच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून १७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.२०५१ सालची  लोकसंख्या गृहीत  २६.३६ दक्ष लक्ष लिटर पाणी प्रतिदीन  लागण्याची शक्यता गृहीत धरून योजनेचा  आराखडा तयार करण्यात आला आहे.सद्य परिस्थितीत जल शुध्दीकरण केंद्राचे आर सी सी डिझाइन प्रमाणे फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून दगडी सोलिंग व क्राॅकींटचे काम प्रगती पथावर असल्याची माहीती मुख्याधिकारी मच्छीद्र घोलप  यांनी सांगितले.पाणी योजनेतील नवीन उंच जलकुंभ काम जुन्या टाकीचे बांधकाम पाडल्यानंतर हाती घेण्यात येणार असून,वितरण व्यवस्थैसाठी ५९ कि.मी.पाइप लाइनच्या कामापैकी १७ कि.मी.पूर्ण काम पूर्ण झाले असल्याचे या पाहाणी दरम्यान सांगण्यात आले.पाणी योजने करीता तलावाचे सर्वेक्षण पूर्ण करून बोअर कोअर चाचणी करण्यात आली आहे.तलावाचे खोलीकरण हे निर्धारीत वेळेत पूर्ण करून आर. सी.सी.काम करण्यात येणार आहे.तलावात आर सी सी काम पूर्ण झाल्यानंतर तळातील मातीचा थर प्लस्टिक शीट वाळूचा थर इत्यादी काम पूर्ण करण्यासाठी दोन महीन्याच्या कालावधी लागणार आहे.योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील एकूण पाच प्रभागात भूमीपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झाले.ठिकठिकाणी नागरीकांशी संवाद साधून मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांच्या समस्या तसेच विकास प्रक्रीयेबाबत असलेल्या सूचना जाणून घेतल्या.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा सभापती दीपक पटारे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी नगराध्यक्ष संजय फंड, केतन खोरे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शरदराव नवले, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांमधील विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

चौकट
‘शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योजना’
योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News