‘त्या’ सर्वांची नावं माझ्याकडे-मा.खा.डॉ.विखे;भाजप जिल्हाध्यक्ष दिनकर यांचे कथित व्हिडीओ क्लिप प्रकरण;पक्षांतर्गत व समदुखी लोकांचा विखे परिवाराला टार्गेट करण्याचा डाव

श्रीरामपूर-जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचे कथित व्हिडीओ क्लिप प्रकरण हे ज्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले नाही तसेच या प्रकरणाच्या आडून विखे पाटील परिवाराला...

श्रीरामपूर-
जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचे कथित व्हिडीओ क्लिप प्रकरण हे ज्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले नाही तसेच या प्रकरणाच्या आडून विखे पाटील परिवाराला टार्गेट करता येईल, अशा काही पक्षांतर्गत आणि काही समदुखी लोकांनी रचलेले षडयंत्र आहे. त्यांची सर्वांची नावे मला माहिती आहेत,असे प्रतिपादन मा खा डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, भाजप मधील काही पक्षांतर्गत लोक पद मिळाली नाहीत म्हणून नाराज झालेले आहेत.ज्याला ते पद मिळालं नाही त्या समदुखी लोकांनी दिनकर यांच्या कथित व्हिडीओ क्लिपचे प्रकरण बाहेर काढले आणि ते भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या पर्यंत पोहचवले.जिल्हाध्यक्ष दिनकर यांनी त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.त्या प्रकरणाची वास्तविकता किती व तो प्रसंग काय आहे हे तेच योग्य पध्दतीने सांगू शकतील. परंतु हे कोणी केलं,यामागची नावं मला माहित आहे.योग्य वेळी त्या संबंधी सत्यता जनतेसमोर येईलच.राजकारणातील हा नवा फंडा (प्रकार) सध्या दिसून येत आहे. पक्षांतर्गत कुरघोडी करण्यासाठी अशा प्रकारे या गोष्टींचा वापर होणे हे नवीनच दिसत आहे.काही लोकांना विखे पाटील परिवाराचा राग आहे.त्यांच्या बद्दल या लोकांच्या मनात असूया आहे.त्यांनीही दिनकर यांच्या आडून विखे पाटील परिवाराला टार्गेट करण्यासाठी हे केलं असावे असेही मला वाटते.कारण शेवटी सगळे समदुखी एकच असतात. काही जण तालुकाध्यक्ष होता आले नाही म्हणून दुःखी आहेत तर काही जण जिल्हाध्यक्ष होता आले नाही म्हणून दुःखी आहेत.काही जणांना आमच्यामुळे वेगवेगळ्या निवडणुकांत यश मिळाले नाही म्हणून ते दुःखी आहेत.असे हे सगळे एकत्र येऊन या पद्धतीचे प्रकार करू पाहत आहेत.आता या गोष्टींवर माझी आता पीएचडी झाली आहे. या प्रकरणातली नावही मला माहिती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे ती आपण मांडू,असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्याकडे नितीन दिनकर यांच्याबाबतचे ‘हे’ साहित्य पोहचविण्याचे काम याच पक्षांतर्गत समदुखी लोकांनी केलं आहे.कदाचित देसाई यांनाही चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवण्यात आली असावी असे माझे वैयक्तीक मत आहे.असे असले तरी ही सगळी बाब आता वरीष्ठ पातळीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  यांच्याकडे आहे.पक्षश्रेष्ठी या गोष्टीवर गंभीरपणे विचार करत आहेत.ते दोनही बाजू ऐकून घेतील आणि त्यावर योग्य निर्णय घेतील.अहिल्यानगर चे जिल्हाध्यक्ष म्हणून नितीन दिनकर यांचे काम उत्तमपणे सुरू आहे आणि पुढेही ते सुरू राहील असा मला विश्वास आहे,असेही डॉ.सुजय विखे पाटील शेवटी म्हणाले.

मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!