‘त्या’ सर्वांची नावं माझ्याकडे-मा.खा.डॉ.विखे;भाजप जिल्हाध्यक्ष दिनकर यांचे कथित व्हिडीओ क्लिप प्रकरण;पक्षांतर्गत व समदुखी लोकांचा विखे परिवाराला टार्गेट करण्याचा डाव

श्रीरामपूर-
जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचे कथित व्हिडीओ क्लिप प्रकरण हे ज्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले नाही तसेच या प्रकरणाच्या आडून विखे पाटील परिवाराला टार्गेट करता येईल, अशा काही पक्षांतर्गत आणि काही समदुखी लोकांनी रचलेले षडयंत्र आहे. त्यांची सर्वांची नावे मला माहिती आहेत,असे प्रतिपादन मा खा डॉ सुजय विखे पाटील यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, भाजप मधील काही पक्षांतर्गत लोक पद मिळाली नाहीत म्हणून नाराज झालेले आहेत.ज्याला ते पद मिळालं नाही त्या समदुखी लोकांनी दिनकर यांच्या कथित व्हिडीओ क्लिपचे प्रकरण बाहेर काढले आणि ते भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या पर्यंत पोहचवले.जिल्हाध्यक्ष दिनकर यांनी त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.त्या प्रकरणाची वास्तविकता किती व तो प्रसंग काय आहे हे तेच योग्य पध्दतीने सांगू शकतील. परंतु हे कोणी केलं,यामागची नावं मला माहित आहे.योग्य वेळी त्या संबंधी सत्यता जनतेसमोर येईलच.राजकारणातील हा नवा फंडा (प्रकार) सध्या दिसून येत आहे. पक्षांतर्गत कुरघोडी करण्यासाठी अशा प्रकारे या गोष्टींचा वापर होणे हे नवीनच दिसत आहे.काही लोकांना विखे पाटील परिवाराचा राग आहे.त्यांच्या बद्दल या लोकांच्या मनात असूया आहे.त्यांनीही दिनकर यांच्या आडून विखे पाटील परिवाराला टार्गेट करण्यासाठी हे केलं असावे असेही मला वाटते.कारण शेवटी सगळे समदुखी एकच असतात. काही जण तालुकाध्यक्ष होता आले नाही म्हणून दुःखी आहेत तर काही जण जिल्हाध्यक्ष होता आले नाही म्हणून दुःखी आहेत.काही जणांना आमच्यामुळे वेगवेगळ्या निवडणुकांत यश मिळाले नाही म्हणून ते दुःखी आहेत.असे हे सगळे एकत्र येऊन या पद्धतीचे प्रकार करू पाहत आहेत.आता या गोष्टींवर माझी आता पीएचडी झाली आहे. या प्रकरणातली नावही मला माहिती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे ती आपण मांडू,असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्याकडे नितीन दिनकर यांच्याबाबतचे ‘हे’ साहित्य पोहचविण्याचे काम याच पक्षांतर्गत समदुखी लोकांनी केलं आहे.कदाचित देसाई यांनाही चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवण्यात आली असावी असे माझे वैयक्तीक मत आहे.असे असले तरी ही सगळी बाब आता वरीष्ठ पातळीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  यांच्याकडे आहे.पक्षश्रेष्ठी या गोष्टीवर गंभीरपणे विचार करत आहेत.ते दोनही बाजू ऐकून घेतील आणि त्यावर योग्य निर्णय घेतील.अहिल्यानगर चे जिल्हाध्यक्ष म्हणून नितीन दिनकर यांचे काम उत्तमपणे सुरू आहे आणि पुढेही ते सुरू राहील असा मला विश्वास आहे,असेही डॉ.सुजय विखे पाटील शेवटी म्हणाले.

मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News