अहिल्यानगर ते सावळीविहीर मार्गाचे काम कुंभमेळ्यापूर्वी-ना.विखे पाटील;सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

श्रीरामपूर-
अहिल्यानगर जिल्ह्यातील  नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर ते अहिल्यानगर दरम्यानच्या मार्गाच्या तसेच
शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,अशी माहिती अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या नगर-मनमाड महामार्ग आणि शेवगाव बायपास रस्त्याच्या प्रलंबित कामासंबंधी गुरुवार दि.10 रोजी दुपारी मंत्रालयात ही आढावा बैठक संपन्न झाली. अहिल्यानगर ते सावळी विहीर या महामार्गाच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. ५१५ कोटी रुपयांचा निधीही देण्यात आलेला आहे. आता हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना या बैठकीत मंत्रीमहोदयांनी दिल्या आहेत.
सदर बैठकीत शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. सदर मार्ग चौपदरी होण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर मनमाड या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे.अंत्यत महत्वाच्या या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्ती होण्याची प्रतीक्षा वाहनधारक व जिल्ह्यातील नागरीकांना होती.निविदा प्रक्रिया होऊन सदर मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नगर-मनमाड महामार्ग आणि शेवगाव बायपास रस्त्याच्या प्रलंबित कामासंबंधी मंत्रालयात सा.बां.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News